शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी ‘आयटीएमएस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:28 IST

या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार आहे.

ठळक मुद्दे४० कोटींची तरतूद : सीसीटीव्ही मॉनिटरिंगद्वारे वाहनांवर लक्ष आणि दंड वसुली

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांमध्ये झालेली वाढ आणि वाहनांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे या मार्गावरुन जाणे धोकादायक ठरु लागले आहे. अपघातांना तसेच बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी आता महामार्गपोलिसांकडून  ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा (आयटीएमएस) वापर केला जाणार आहे. या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार असल्याचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले. महामार्ग पोलीस आता आयटीएमएस ही सिस्टीम राबविणार आहेत. द्रुतगती मार्ग एकूण ९४.५ किलोमीटरचा आहे. सहा पदरी असलेल्या या रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. हाय रिज्यूलेशनचे या सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक गाडीचे मॉनिटरिंगही शक्य होणार आहे. कॅमेºयांद्वारे गाड्यांच्या नंबरप्लेट, त्यांचा वेग, लेन शिस्त पाळली जात आहे, की नाही यावर लक्ष ठेवता येणार आहे. सीसीटीव्हींच्या माध्यमातून गाडीच्या मार्गावरही लक्ष ठेवता येणार असून, आवश्यकता भासेल तसे अशा वाहनांना महामार्गावरच बाजूला घेऊन कारवाई करणे शक्य होणार आहे. नियमभंग करणाºया वाहनांच्या नंबरप्लेटवरुन वाहनचालक-मालकांना आॅनलाइन चलन देऊन दंड आकारणीही केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, सध्या हा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत आहे. मुंबई-पुण्यातील अंतर कमी वेळेत कापले जावे आणि व्यापाराला चालना मिळावी याकरिता द्रुतगती उभारण्यात आला. गेल्या काही वर्षात या रस्त्यावरील प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. चालू वर्षात ऑगस्ट अखेरीस ६३ अपघात झाले असून, यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेरीस ३४ अपघातांत ३८ जणांचा मृत्यू झाला होता. वाहनांचा अमर्यादित वेग आणि लेन शिस्त पाळली जात नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. अति वेगामुळे टायर फुटण्याच्या तसेच मोटारी उलटल्याच्याही घटना घडत असतात.  ..........महामार्ग पोलिसांनी या अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता जड वाहनांना शेवटच्या लेनमधून जाणे बंधनकारक केले आहे. तसेच काही काळ ड्रोनद्वारे रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा प्रयत्न अल्पकाळातच बंद करावा लागला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आल्यास तसेच लेनशिस्त पाळली गेल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. .......

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातPoliceपोलिस