शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी ‘आयटीएमएस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:28 IST

या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार आहे.

ठळक मुद्दे४० कोटींची तरतूद : सीसीटीव्ही मॉनिटरिंगद्वारे वाहनांवर लक्ष आणि दंड वसुली

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांमध्ये झालेली वाढ आणि वाहनांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे या मार्गावरुन जाणे धोकादायक ठरु लागले आहे. अपघातांना तसेच बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी आता महामार्गपोलिसांकडून  ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा (आयटीएमएस) वापर केला जाणार आहे. या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार असल्याचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले. महामार्ग पोलीस आता आयटीएमएस ही सिस्टीम राबविणार आहेत. द्रुतगती मार्ग एकूण ९४.५ किलोमीटरचा आहे. सहा पदरी असलेल्या या रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. हाय रिज्यूलेशनचे या सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक गाडीचे मॉनिटरिंगही शक्य होणार आहे. कॅमेºयांद्वारे गाड्यांच्या नंबरप्लेट, त्यांचा वेग, लेन शिस्त पाळली जात आहे, की नाही यावर लक्ष ठेवता येणार आहे. सीसीटीव्हींच्या माध्यमातून गाडीच्या मार्गावरही लक्ष ठेवता येणार असून, आवश्यकता भासेल तसे अशा वाहनांना महामार्गावरच बाजूला घेऊन कारवाई करणे शक्य होणार आहे. नियमभंग करणाºया वाहनांच्या नंबरप्लेटवरुन वाहनचालक-मालकांना आॅनलाइन चलन देऊन दंड आकारणीही केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, सध्या हा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत आहे. मुंबई-पुण्यातील अंतर कमी वेळेत कापले जावे आणि व्यापाराला चालना मिळावी याकरिता द्रुतगती उभारण्यात आला. गेल्या काही वर्षात या रस्त्यावरील प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. चालू वर्षात ऑगस्ट अखेरीस ६३ अपघात झाले असून, यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेरीस ३४ अपघातांत ३८ जणांचा मृत्यू झाला होता. वाहनांचा अमर्यादित वेग आणि लेन शिस्त पाळली जात नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. अति वेगामुळे टायर फुटण्याच्या तसेच मोटारी उलटल्याच्याही घटना घडत असतात.  ..........महामार्ग पोलिसांनी या अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता जड वाहनांना शेवटच्या लेनमधून जाणे बंधनकारक केले आहे. तसेच काही काळ ड्रोनद्वारे रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा प्रयत्न अल्पकाळातच बंद करावा लागला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आल्यास तसेच लेनशिस्त पाळली गेल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. .......

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातPoliceपोलिस