शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं, पण फडणवीस यांना शुभेच्छा..! छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:23 IST

गोर-गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री मिळावा

पुणे : ‘‘मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं आहे. पण यावेळी भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत. म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होईल, पण जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला आनंदच होईल,’’ असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केले.पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. अजित पवार आणि त्यांच्या पक्षांनी देवेंद्र फडणवीस चालतील, अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले असल्याने मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा सुटलेला आहे. अशातच भुजबळ यांनी पुण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल, असे सांगितले आणि त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छादेखील दिल्या.भुजबळ म्हणाले, ओबीसी मुख्यमंत्री व्हावा, यापेक्षा गोर-गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा हीच आमची अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये चांगलं काम केलं आहे. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम दिलं, त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदावर बसले तर आनंद होईल.’’मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मी ईव्हीएम मशीनमुळे जिंकलो असेल, तर मलादेखील एक लाख मतं मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं, ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहापासून रात्री दोनपर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याचं काम केलं, म्हणून माझं मताधिक्य कमी झालं असेल !’’आम्ही मराठा समाजाविरोधात नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्यावे, ते त्यांना मिळायला हवं. सरकारने त्यांना आरक्षण दिले आहे. त्यांना १० टक्के ईबीसी आरक्षण ठेवले आहे. गोर-गरिबांना न्याय मिळायला हवा.- छगन भुजबळ, माजी मंत्री

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस