शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 20:52 IST

का होतोय इतका परीक्षार्थी उमेदवारांचा संताप?

प्राची कुलकर्णी - परीक्षा रद्द झाल्याच्या रागात एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. पण हा आक्रोश नेमका कशासाठी? काय आहे या विद्यार्थ्यांची अडचण, कसे आहे या मुलांचे आयुष्य हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. 

पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो अभ्यासिका उभ्या राहिल्या. पेठेतल्या या अभ्यासिका म्हणजे एक खोली आणि त्यात ओळीने मांडलेल्या टेबल खुर्च्या. काही अभ्यासिकांमध्ये अगदी वायफाय पासून ते लायब्ररी पर्यंतची सोय.पण सोयी सुविधांमध्ये फरक झाला तरी प्रत्येक अभ्यासिकेतले विद्यार्थ्याचे विश्व असते ते ही टेबल खुर्चीच.. दिवसातले जवळपास १० ते ११ तास विद्यार्थी या खुर्चीवर बसुन असतात. पुढ्यातली पुस्तके वाचत किंवा कानात हेडफोन घालुन लेक्चर ऐकत आणि यासाठी हे विद्यार्थी मोजतात महिन्याकाठी ७०० ते ८०० रुपये. पण मुलांसाठी हा खर्च म्हणजे त्यांच्या अनेक खर्चांपैकी एक. आणि खरंतर त्यांच्या इतर खर्चात सगळ्यात कमी. 

दिवसभर याच अभ्यासिकेतल्या स्वत:च्या खुर्चीवर अभ्यास आणि रात्री नोकरी हे गेले २ वर्ष २३ वर्षांच्या आशिष पवारचे रुटीन झाले आहे. मूळ यवतमाळचा असणाऱ्या आशिषचे पालक मोलमजुरी करतात. त्यातून स्वत:चा खर्च भागवतानाच नाकीनऊ येतात.. त्यामुळे पुण्यात राहायला आलेल्या आशिषला स्वत:चा खर्च अर्थातच स्वत: भागवावा लागतोय. सकाळी उठल्यापासून अभ्यास, मध्ये फक्त घेतला तर जेवणाचा ब्रेक आणि रात्री वॅाचमनची नोकरी करत तो महिन्याकाठी येणारा ८ ते १० हजारांचा खर्च भागवतोय. पुस्तक खरेदी आणि इतर काही खर्च आला की हे गणित आणखीच बिघडते. 'लोकमत'शी बोलताना आशिष म्हणाला “एका खोलीत १० ते १२ जण राहतो. दिवसभर अभ्यास आणि रात्री नोकरी करतो.पण दोन वर्ष झाली परीक्षा नाही झाली. काय करावे ते कळत नाही. घरच्यांना माहितीय की, मुलगा परीक्षा द्यायला गेला. पण इतकं सगळं करुन पुण्यात राहुन मुलाला परीक्षा देताच आली नाही हे त्यांना कुठे माहीत?” 

आशिषसारखीच अवस्था नांदेडच्या २३ वर्षांच्या सम्यक कोकरेची. त्याच्या घरचेही मोलमजुरी करत त्याच्या शिक्षणाला पाठिंबा देत आहेत. पुण्यात गेलेला मुलगा म्हणजे त्याचे आयुष्य सुधारेल, परीक्षा झाली की त्याला सरकारी नोकरी लागेल ही पालकांची अपेक्षा. पण प्रत्यक्षात मात्र “सकाळी आई- वडील रोजंदारीला जातात. त्या कमाईतून त्यांची संध्याकाळच्या जेवणाची सोय होते. त्यातून जे पैसे उठतात ते माझ्यासाठी पाठवतात. एक वर्ष त्यांनी मदत केली मग कोरोना आला. आता परीक्षाच नाही” 

अशीच अवस्था कमी अधिक फरकाने सगळ्याच विद्यार्थ्यांची. मग एमपीएससी तयारी करतात तरी का हे विचारल्यावर कोल्हापूरचा एक विद्यार्थी म्हणाला “ घरची शेती आहे. त्याची अवस्था बघितल्यावर शिक्षण घेतले.शिक्षण घेतल्यावर त्याचा उपयोग काय म्हणून नोकरी शोधायला लागलो.पण नोकरी मिळेचना..यातूनच एमपीएससीकडे वळलो. 

या मुलांसारखेच हजारो विद्यार्थी आहेत. कोणी २१ वर्षी तयारी सुरु केलीये तर कोणी २३व्या.. पण दोन चार वर्ष अभ्यास करुन केवळ परिक्षा होईना म्हणून संधी हातची जातेय का काय अशी भीती त्यांना वाटतेंय. आणि याचाच उद्रेक होत आज ते रस्त्यावर उतरले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे