शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कृषीव्यवस्था आणि तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:19 IST

शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता: व्यंकय्या नायडू  

ठळक मुद्देकृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर चर्चासत्राचे उदघाटनशाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट

पुणे : देशातील शेतीशी संबंधित उद्योगांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी विचार केल्यास आलेख उंचावत आहे. मात्र, दुसरीकडे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, उद्योगपतीचा मुलगा उद्योगात लक्ष घालतो. याउलट शेतक-याचा मुलगा शेतीव्यवसायाकडे वळताना दिसत नाही. या परिस्थितीमुळेच भविष्यात कृषीव्यवस्था व तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक होणार आहे,  असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी व्यक्त केले. पायाभुत सुविधा, गुंतवणूक, विश्वासार्हता आणि सिंचन या चतुसुत्रीचा अवलंब केल्यास परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, एस. के. पट्टनायक, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, आंध्रप्रदेशचे माजी कृषीमंत्री व्ही.  राव, अशोक गुलाटी आदी मान्यवर  उपस्थित होते. यावेळी  डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ’’ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरइव्हर  ‘‘या विषयावर सादरीकरण केले.  नायडू म्हणाले,  शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच फळे, भाजीपाला, मसाले, डाळी, आणि ऊस यांसारख्या उच्च मूल्यांच्या पिकाची लागवड करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतक-यांना पीक पध्दती, कापणीनंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमुखपणे काम करावे.  शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले,  पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्रावर मोठा ताण येतो. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येते. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही शास्त्रशुद्ध प्रक्रीया असणारी चळवळ आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक खेडी जलस्वयंपूर्ण झाली आहेत. शेकडो गावे पाणीदार झाली असून त्याठिकाणी संरक्षीत  सिंचन शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. शाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट आहे. कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. छोटी जमीनधारणा ही सुध्दा शाश्वत शेतीसमोरील मोठी समस्या आहे. शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध योजना आखण्यात आल्या आहेत.नोटाबंदीचा शेती व्यवसायावर प्रतिकुल परिणामशरद पवार म्हणाले, नोटाबंदीच्या काळानंतर शेतीव्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला. त्याचा फटका इतर व्यवसायांना देखील बसला. कौशल्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग करुन आता शेतीव्यवसायात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. यापुढील काळात शेतीव्यवसायाशी संंबंधित धोरण ठरविताना बाजारपेठेचा विचार करण्याची गरज आहे.  पाणी या शेतीव्यवसायातील सर्वाधिक महत्वाचा घटक असून भविष्यात त्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील अभिनव कृषीविषयक प्रयोगांची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस