शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:41 IST

भीमाशंकरला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक : २५ गावांतील शेतकरी-सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित

डिंभे : डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. परंतु, वर्षानुवर्षे या भागातील भूमिपुत्रांना पाण्यापासून वंचित ठेवले जाते. ‘आता नाही तर कधीच नाही’ असे जाहीर आवाहन करून डिंभे धरणाच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्याचा पवित्रा डिंभे धरण प्रकल्पग्रस्तांनी घेतला. यामुळे डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणाचे पाणी मिळावे, या मागणीसाठी रविवारी भीमाशंकर येथील कळमजाई मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीसाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व २५ गावांतील आदिवासी शेतकरी उपस्थित होते. यावेळी डिंभे धरणाच्या पाण्याच्या वाटपाबाबत या गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी या बैठकीत कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासी भागातील पाणीप्रश्नावर या वेळी पहिल्यांदाच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत एकवाक्यता आसल्याचे पाहावयास मिळाले.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, मेघोली, दिगद, सावरली, वचपे, बोरघर, जांभोरी, आमडे, पोखरी, डिंभे बुद्रुक, फलोदे, साकेरी, नानवडे, पंचाळेखुर्द, कळंबई, फुलवडे, माळीण, अडिवरे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी इत्यादी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन शेतजमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे कायमची निराधार झाली आहेत. ज्या-ज्या वेळेस सिंचनाच्या मागणीसाठी शेतकºयांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केले, त्या-त्या वेळेस प्रशासनाकडून या भागात छोटे मोठे बंधारे बांधू, खडकातील टाक्या काढू, तळ्यांचे प्रस्ताव तयार करून पाणीप्रश्न सोडवता येईल का? यावर शेतकºयांचे लक्ष वेधून मुख्य प्रश्नाला बगल देण्याचे काम केले आहे. बुडीत क्षेत्रातील काही गावे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकºयांना लाभक्षेत्रात जमिनी मिळाल्या नाहीत. ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांना ताब्यासाठी झगडावे लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भूमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकºयांच्या मनामध्ये तीव्र नाराजी असल्याचे बैठकीत पाहावयास मिळाले.

बैठकीदरम्यान या भागाला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याची एक योजना उपस्थितांसमोर मांडण्यात आली. मृतसाठा व पाणीवाटप वजा जाता येडगाव फिडिंगसाठी जाणा-या साठ्यापैकी ०.८० टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला मिळावे, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे. कोलतावडे गावच्या सागाचीवाडी येथून पाणी उचलून मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी पोखरी गावाजवळील वाघोबाच्या डोंगरावर पाच एकर मध्ये मुख्य तळे तयार करून हे पाणी त्यात सोडावे. पुढे गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, राजेवाडी, पोखरी, चिखली, नांदुरकीचीवाडी, तळेघर,जांभोरी, फळोदे, राजपूर व तेरूंगण येथे गावतळ्यांत हे पाणी सोडावे. पुढील पाणीवाटप हे प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने आपआपली यंत्रणा राबवून शेतकºयांच्या शेतापर्यंत देण्याची व्यवस्था करावायाची आहे. असे या योजनेचे प्राथमिक स्वरूप तयार करण्यात आले आहे. योजनचा प्रारूप अराखडा तयार करण्यासाठी मायक्रॉक्स इंजिनिअर्स मुंबई या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

या वेळी पुणे जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती व आदिवासी भागाचे नेते सुभाष मोरमारे, आंबेगाव पंचायत समितीउपसभापती नंदकुमार सोनावले,माजी जि.प.सदस्य विजय आढारी, जि.प.सदस्या रूपाली जगदाळे, इंदूबाई लोहकरे, पं.स.सदस्य संजय गवारी, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मारूती लोहकरे, भाजपाचे मारूती भवारी,मोहन नंदकर, मारूती केंगले, अवजड वहातुक सेना उपाध्यक्ष दीपक घोलप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.बी.घोडे, सलीम तांबोळी. अनेक गावचे सरपंच व तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे २५ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDamधरण