शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:41 IST

भीमाशंकरला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक : २५ गावांतील शेतकरी-सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित

डिंभे : डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. परंतु, वर्षानुवर्षे या भागातील भूमिपुत्रांना पाण्यापासून वंचित ठेवले जाते. ‘आता नाही तर कधीच नाही’ असे जाहीर आवाहन करून डिंभे धरणाच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्याचा पवित्रा डिंभे धरण प्रकल्पग्रस्तांनी घेतला. यामुळे डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणाचे पाणी मिळावे, या मागणीसाठी रविवारी भीमाशंकर येथील कळमजाई मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीसाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व २५ गावांतील आदिवासी शेतकरी उपस्थित होते. यावेळी डिंभे धरणाच्या पाण्याच्या वाटपाबाबत या गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी या बैठकीत कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासी भागातील पाणीप्रश्नावर या वेळी पहिल्यांदाच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत एकवाक्यता आसल्याचे पाहावयास मिळाले.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, मेघोली, दिगद, सावरली, वचपे, बोरघर, जांभोरी, आमडे, पोखरी, डिंभे बुद्रुक, फलोदे, साकेरी, नानवडे, पंचाळेखुर्द, कळंबई, फुलवडे, माळीण, अडिवरे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी इत्यादी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन शेतजमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे कायमची निराधार झाली आहेत. ज्या-ज्या वेळेस सिंचनाच्या मागणीसाठी शेतकºयांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केले, त्या-त्या वेळेस प्रशासनाकडून या भागात छोटे मोठे बंधारे बांधू, खडकातील टाक्या काढू, तळ्यांचे प्रस्ताव तयार करून पाणीप्रश्न सोडवता येईल का? यावर शेतकºयांचे लक्ष वेधून मुख्य प्रश्नाला बगल देण्याचे काम केले आहे. बुडीत क्षेत्रातील काही गावे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकºयांना लाभक्षेत्रात जमिनी मिळाल्या नाहीत. ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांना ताब्यासाठी झगडावे लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भूमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकºयांच्या मनामध्ये तीव्र नाराजी असल्याचे बैठकीत पाहावयास मिळाले.

बैठकीदरम्यान या भागाला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याची एक योजना उपस्थितांसमोर मांडण्यात आली. मृतसाठा व पाणीवाटप वजा जाता येडगाव फिडिंगसाठी जाणा-या साठ्यापैकी ०.८० टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला मिळावे, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे. कोलतावडे गावच्या सागाचीवाडी येथून पाणी उचलून मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी पोखरी गावाजवळील वाघोबाच्या डोंगरावर पाच एकर मध्ये मुख्य तळे तयार करून हे पाणी त्यात सोडावे. पुढे गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, राजेवाडी, पोखरी, चिखली, नांदुरकीचीवाडी, तळेघर,जांभोरी, फळोदे, राजपूर व तेरूंगण येथे गावतळ्यांत हे पाणी सोडावे. पुढील पाणीवाटप हे प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने आपआपली यंत्रणा राबवून शेतकºयांच्या शेतापर्यंत देण्याची व्यवस्था करावायाची आहे. असे या योजनेचे प्राथमिक स्वरूप तयार करण्यात आले आहे. योजनचा प्रारूप अराखडा तयार करण्यासाठी मायक्रॉक्स इंजिनिअर्स मुंबई या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

या वेळी पुणे जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती व आदिवासी भागाचे नेते सुभाष मोरमारे, आंबेगाव पंचायत समितीउपसभापती नंदकुमार सोनावले,माजी जि.प.सदस्य विजय आढारी, जि.प.सदस्या रूपाली जगदाळे, इंदूबाई लोहकरे, पं.स.सदस्य संजय गवारी, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मारूती लोहकरे, भाजपाचे मारूती भवारी,मोहन नंदकर, मारूती केंगले, अवजड वहातुक सेना उपाध्यक्ष दीपक घोलप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.बी.घोडे, सलीम तांबोळी. अनेक गावचे सरपंच व तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे २५ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDamधरण