शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विमान अपघातात मृत्यू हा इतिहास खरा आहे का? संशाेधनातून उलगडणार नेताजी बाेस यांच्या मृत्यूचे गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:19 IST

नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते का, ते जिवंत होते तर सरकारने ते कधी मान्य का केले नाही, अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार

पुणे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला एका विमान अपघातात झाला, असे सांगितले जाते; मात्र हा इतिहास खरा आहे का, भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले का? त्यांच्या जगण्यावर किंवा मरणावर राजकारण करायचे होते का, विविध प्रश्नांची उत्तरे आता पुणेकरांना मिळणार आहे. कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर वीस वर्षांहून अधिक काळ संशोधन करणारे अनुज धर आणि चंद्रचूड घोष हे दोघेही एकाच मंचावरून काही कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि मृत्यूचे गूढ उकलणार आहेत.

येत्या रविवारी (दि. २६) रात्री ९ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमेश गोसावी, आशुतोष नर्लेकर आणि संजय गोसावी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी नेताजी याच विषयावर आतापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यांनी अनेक वर्षे केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते. या संदर्भातील संशोधन सुरू केल्यानंतर नेताजींच्या स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे अशी दोन वेगळी आयुष्ये होती. त्यातील समान धागे शोधण्याचा प्रयत्न धर आणि घोष या जोडीने केला असून, त्यांच्या संशोधनाचा हा चित्तथरारक प्रवास ते पुणेकरांसमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांना नेताजींचा मृत्यू सरकारने दिलेल्या तारखेलाच झाला का, नेताजी १९८५ पर्यंत भारतातील उत्तर प्रदेशमध्ये राहत होते का, नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते का, ते जिवंत होते तर सरकारने ते कधी मान्य का केले नाही, अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसAccidentअपघातIndiaभारत