शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अमित शहांकडून इच्छुकांच्या जनप्रतिमेची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 07:03 IST

लोकसभेच्या राज्यातील उमेदवार निवडीसाठी भाजपाच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत

पुणे : लोकसभेच्या राज्यातील उमेदवार निवडीसाठी भाजपाच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या जनमानसातील प्रतिमेबाबत विचारणा केली असल्याचे समजते. विद्यमान आमदार, खासदार यांच्या मागील पंचवार्षिकमधील कामाबाबत तसेच मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा कशी आहे, याबाबत त्यांनी चौकशी चालवली असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.स्वच्छ प्रतिमा, अजातशत्रू, वादात न अडकता काम करण्याची शैली व जनमानसातील चांगली प्रतिमा याला पक्षाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. एक-एक जागा महत्त्वाची समजून अयोग्य उमेदवार दिला जाऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारासाठी स्वत: शहा यांनीच हे निकष लावल्याचे समजते.त्यामुळेच राज्यातील आमदार, खासदारांवर किती आणि कोणते आरोप झाले आहेत, न्यायालय वा कोणत्या सामाजिक संस्थांनी त्यांच्यावर ताशेरे मारले आहेत काय, वगैरे माहिती शहा यांच्या कार्यालयाकडून जमा केली जात आहे. पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा हा पक्षाचा ‘यूनिक सेलिंग पॉइंट’ आहे. काँग्रेस कितीही आरोप करीत असली, तरी मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे कसलेही आरोप झालेले नाहीत. त्याला साजेसे असेच उमेदवार देण्याचा पक्षाचा प्रयत्नआहे. त्यामुळेच ही माहिती जमा केली जात आहे.उमेदवारीसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात चुरस आहे. खासदार शिरोळे यांच्यावर गेल्या ५ वर्षांत कसलेही आरोप झालेले नाहीत; मात्र त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी असल्याची चर्चा असते.बापट वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावर वादांची तीव्रता कमी करून घेण्यात यश मिळवले आहे. शहा यांच्या कसोटीवर कोण उतरते, याची उत्सुकता पक्ष कार्यकर्ते व राजकीय वतुर्ळात निर्माण झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाPuneपुणेBJPभाजपा