शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अमित शहांकडून इच्छुकांच्या जनप्रतिमेची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 07:03 IST

लोकसभेच्या राज्यातील उमेदवार निवडीसाठी भाजपाच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत

पुणे : लोकसभेच्या राज्यातील उमेदवार निवडीसाठी भाजपाच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या जनमानसातील प्रतिमेबाबत विचारणा केली असल्याचे समजते. विद्यमान आमदार, खासदार यांच्या मागील पंचवार्षिकमधील कामाबाबत तसेच मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा कशी आहे, याबाबत त्यांनी चौकशी चालवली असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.स्वच्छ प्रतिमा, अजातशत्रू, वादात न अडकता काम करण्याची शैली व जनमानसातील चांगली प्रतिमा याला पक्षाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. एक-एक जागा महत्त्वाची समजून अयोग्य उमेदवार दिला जाऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारासाठी स्वत: शहा यांनीच हे निकष लावल्याचे समजते.त्यामुळेच राज्यातील आमदार, खासदारांवर किती आणि कोणते आरोप झाले आहेत, न्यायालय वा कोणत्या सामाजिक संस्थांनी त्यांच्यावर ताशेरे मारले आहेत काय, वगैरे माहिती शहा यांच्या कार्यालयाकडून जमा केली जात आहे. पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा हा पक्षाचा ‘यूनिक सेलिंग पॉइंट’ आहे. काँग्रेस कितीही आरोप करीत असली, तरी मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे कसलेही आरोप झालेले नाहीत. त्याला साजेसे असेच उमेदवार देण्याचा पक्षाचा प्रयत्नआहे. त्यामुळेच ही माहिती जमा केली जात आहे.उमेदवारीसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात चुरस आहे. खासदार शिरोळे यांच्यावर गेल्या ५ वर्षांत कसलेही आरोप झालेले नाहीत; मात्र त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी असल्याची चर्चा असते.बापट वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावर वादांची तीव्रता कमी करून घेण्यात यश मिळवले आहे. शहा यांच्या कसोटीवर कोण उतरते, याची उत्सुकता पक्ष कार्यकर्ते व राजकीय वतुर्ळात निर्माण झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहाPuneपुणेBJPभाजपा