शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

भारतीय रेल्वेचं 'पर्यावरणपूरक' मोठं पाऊल! ७३ हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:29 IST

आगामी काळात देशातील सर्वच रेल्वे गाड्यांत जैव शौचालये पाहायला मिळणार आहे.

पुणे : भारतीय रेल्वेनेपर्यावरणपूरक व मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आणि तितकेच मोठे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत रेल्वे गाड्यांमध्ये आता जैव शौचालये बसविण्यात प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे देशभरातील आतापर्यंत ७३ हजार रेल्वे डब्यांमध्ये २ लाख ५८ हजार ९०६ जैव शौचालये बसविण्यात आली आहेत. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे थेट लोहमार्गावर मानवी मलमूत्र  विसर्जित होऊन मानवी आरोग्य आणिपर्यावरणावर  होणारे दुष्परिणाम टाळता येेेणे शक्य होत आहे.

रेल्वे मंत्रालयाने रेल्वेगाड्यांमध्ये जैव-शौचालयाची सुविधा बसविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी करताना भारतात आतापर्यंत एकूण ७३ हजार रेल्वे डब्यांमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त जैव-शौचालये बसविण्यात आली आहेत. यामुळे दिवसाला रेल्वेगाड्यांमधून लोहमार्गावर विसर्जित होणारे २ लाख ७४ हजार लिटर मानवी मलमूत्र रोखण्यात यश येत आहे.मध्य रेल्वेने यात पुढाकार घेत आपल्या सर्व डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली आहेत.

देशातील रेल्वेस्थानक आणि लोहमार्ग साध्या रचनेच्या शौचालयांमुळे नेहमीच चर्चेत होते. कारण मलमूत्र विसर्जन थेट लोहमार्गावर होत असल्याने परिसरात  मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत होती. तसेच यामुळे रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्यासोबतच पर्यावरणावर सुद्धा दुष्परिणाम होत होता. भारतीय रेल्वेने या समस्यांवर पर्याय म्हणून रेल्वेच्या डब्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. प्रत्येक विभागाला आपापल्या गाड्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे लक्ष देण्यात आले होते. मध्य रेल्वेने आपल्या सर्व गाडय़ांमधील पाच हजार डब्यांमध्ये जैव-शौचालये  बसविली आहे.

कशी होते प्रक्रिया ?  

भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये ही जैव-शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात रेल्वे डब्यांमध्ये शौचालयाच्या खालील भागात एका मोठ्या रचनेच्या टाकी बसविली आहे. त्या टाकीत जीवाणूंची पैदास करत मानवी मैल्याचे त्यांच्यामार्फत पाण्यामध्ये रूपांतर केले जाते. तसेच क्लोरिनच्या सहाय्य्याने ते पाणी स्वच्छ केले जाते. अशाप्रकारे लोहमार्गावर केवळ प्रदूषणमुक्त पाणीच बाहेर टाकले जाते. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत आहे.तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा कोणते दुष्परिणाम होत नाही.सध्या फक्त वापरात असणाऱ्या गाड्यांमध्ये ही शौचालये बसविण्यात आली आहेत. नव्याने निर्मिती होत असलेल्या रेल्वेच्या डब्यांमध्ये आता जैव-शौचालयेच बसविण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्वच रेल्वे गाड्यांत जैव शौचालये पाहायला मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलenvironmentपर्यावरणHealthआरोग्य