शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

विज्ञान-तंत्रज्ञानात भारत लवकरच " लीडर " : डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:24 PM

उद्योगाकडे वळणाऱ्या तरूणांनी बेडुक उडी न घेता हनुमान उडी घ्यायला हवी.

पुणे : विज्ञानतंत्रज्ञान, नाविन्यता या गोष्टींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. लोकांमध्ये विज्ञानाविषयी प्रचंड उत्सुकता असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरही होत आहे. या क्षेत्रामध्ये तरूणांना अधिक संधी देण्यासाठी सकारात्मक धोरणे आखली जात आहेत. यांसह लोक सहभागातून देश लवकरच विज्ञान व तंत्रज्ञानात जगात '' लीडर'' म्हणून पुढे येईल, असा विश्वास प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. आयसीएफएआय बिझनेस स्कुल, इन्स्टिट्यूट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, होप फाउंडेशनचे आयस्क्वेअरआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आणि बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवलच्या (आयबीएलएफ) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह्यकेपीआयटीह्णचे सहसंस्थापक रवी पंडित, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, ह्यबिझनेस वर्ल्डह्णचे डॉ. अनुराग बत्रा,  ह्यआयसीएफएआयह्णच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक , शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारतकुमार अहुजा, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ आदी उपस्थित होते.डॉ. माशेलकर म्हणाले, उद्योगाकडे वळणाऱ्या तरूणांनी बेडुक उडी न घेता हनुमान उडी घ्यायला हवी. धीरभाई अंबानी यांंच्या सारखे उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रखर महात्वाकांक्षा असेल तर हे सहज शक्य आहे. स्टार्टअप इंडियामुळे व्यवसायातून नोकऱ्या निर्माण करण्याकडे तरुणांचा ओढा आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आपण सार्वजनिक क्षेत्रासाठीच्या खरेदीतील १० टक्के खरेदी स्टार्ट अपकडून करायची, हे बंधनकारक केले आहे. तरूणांसाठी खुप चांगली धोरणे आणण्यात आली आहे. उद्योजकता विकसनासाठी निरनिराळे कार्यक्रम, धोरण राबविले जात आहे. विविध क्षेत्रांमध्ये असमतोल वाढत चालला आहे. इंधन क्षेत्राचाच विचार केल्यास ठराविक देश, कंपन्यांकडे ही मक्तेदारी आहे. त्यातून असमतोल वाढत आहे. चुकीच्या इंधन वापराने पर्यावरणावर परिणाम होत आहे. नागरी भागातील चरा व्यवस्थापन, वाहतुक हे महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टींचा समतोल साधण्यासाठी तंत्रज्ञान, धोरण, लोकसहभाग आणि आर्थिक नियोजन याचा मेळ घालवा लागेल. ही आव्हाने पेलण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, अशी अपेक्षा रवी पंडित यांनी व्यक्त केली. डॉ. नटराजन यांनी ह्यउद्योग जगतात होत असलेले नवीन बदल उद्योजकांनी स्वीकारायला हवेत,ह्ण असे सांगितले. बत्रा, टिळक व दुआ यांनीही मनोगत व्यक्त केले. कटारा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैदही बॅनर्जी यांनी सुत्रसंचालन केले.--------------

टॅग्स :Puneपुणेtechnologyतंत्रज्ञानscienceविज्ञानIndiaभारत