शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये इंदापूरचा समावेश करावा; हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 1:12 PM

तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत

इंदापूर :अवर्षणप्रवण क्षेत्रात असणाऱ्या इंदापूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्याचा समावेश गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करावा, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली केली आहे.

सन २०२३ च्या खरीप हंगामाच्या परिस्थिती संदर्भात राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने गंभीर दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या ४३ तालुक्यांची दुष्काळग्रस्त व मध्यम दुष्काळग्रस्त अश्या दोन भागात विभागणी केली आहे. २४ तालुक्यांचा गंभीर दुष्काळग्रस्त भागात तर १६ तालुक्यांचा मध्यम दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे. त्याच्या अनुषंगाने शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्तुत्य व चांगला आहे, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे.

इंदापूर हा अवर्षणप्रवण भागातील तालुका आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. परिणामी गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या २४ तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचा समावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आल्याची बाब वस्तुस्थितीशी विसंगत आहे. गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात लागू असणाऱ्या शासनाच्या सवलती जर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाल्या तर या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात इंदापूर तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी पत्रात शेवटी केली आहे.

...तर सवलती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतील 

इंदापूर तालुक्याचा सामावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या २४ तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे, तशीच गंभीर दुष्काळी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये असून, दुष्काळाच्या झळा इंदापूर तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना बसलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे आतापासूनच पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असल्याने इंदापूर तालुक्याचा समावेश हा गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात करणेबाबत सहकार्य करावे, त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू होणाऱ्या सवलती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतील, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाRainपाऊस