शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

वाढते कोरोना रुग्ण आणि लॉकडाऊनच्या शक्यतेचा उद्योग विश्वाला फटका. पुण्यातील कंपन्यांचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:38 PM

मराठा चेंबर चे सर्वेक्षण अनिश्चिततेमुळे फटका बसला असण्याची शक्यता. केंद्र सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देण्याची मागणी.

रुग्ण वाढ आणि लॉकडाऊन ची शक्यता यामधून निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका उद्योग विश्वाला काही प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यातील उद्योग विश्व काही प्रमाणात सावरायला सुरुवात झाली होती. पण लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आणि रुग्ण संख्या वाढायला लागली तसा मार्चमध्ये उत्पादनामध्ये मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी घट झाली आहे. 

 

 मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 48 टक्के कंपन्यांनी त्यांचा उत्पादन हे पूर्वपदावर आल्याचं म्हटलं आहे. तर उर्वरित कंपन्यांनी पूर्वपदावर येण्यासाठी ३ ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल असं सांगितलं आहे. दरम्यान रोजगाराचे प्रमाण मात्र फेब्रुवारी इतकेच म्हणजे 86% राहिले आहे आहे. लॉकडाऊन लागल्यास यात आणखी फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे लॉकडाऊन नकोच अशी भूमिका एमसीसीआयए च्या वतीने घेण्यात आली आहे. 

 

गेल्यावर्षीचा लॉकडाऊन आणि कोरोना याचा फटका उद्योग विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर मराठा चेंबर च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. हे बारावे सर्वेक्षण असून यामध्ये कोरोनाचा कंपन्यांवर झालेला परिणाम याचा अभ्यास करण्यात येत आहे. आत्ता करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पुणे जिल्ह्यातील शंभर कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 

 

या सर्वेक्षणानुसार कंपन्यांचे उत्पादन हे फेब्रुवारी पेक्षा दोन टक्क्यांनी घटले आहे. तसेच जानेवारी 2020 च्या उत्पादन पातळीवर यायला त्यांना साधारण पुढचे तीन ते सहा महिने लागू शकतात. 48 टक्के कंपन्यांचे उत्पादन हे पूर्व पातळीवर आले आहे तर 19 टक्के कंपन्यांच्या मते साधारण तीन महिन्यांमध्ये ते पूर्वपदावर येईल. तर 17 टक्के कंपन्याना मात्र यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकेल असे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. 

 

याच पार्श्वभूमीवर एमसीसीआयए चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी लॉकडाऊन नको अशी भूमिका घेतली आहे. "लॉकडाउन लागल्यास उद्योग विश्व पुन्हा कोलमडेल. त्यामुळे लॉकडाऊन ला आमचा विरोध आहे. लसीकरण वाढवल्यास जास्तीत जास्त लोक उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतील" असे मेहता म्हणाले.

 

दरम्यान संचालक प्रशांत गिरबने यांच्या मते " एप्रिल पासून फेब्रुवारी पर्यंत सर्व सर्वेक्षणातून उद्योग विश्व पुन्हा उभे रहात असल्याचे चिन्ह दिसत होते. पण मार्चमध्ये याला थोडा फटका बसलेला दिसत आहे. फर्म जेवढी लहान तेवढा रिकव्हरी ला लागणारा वेळ जास्त आहे. त्यामुळेच सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देणे गरजेचे आहे" 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र