शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वाढत्या कोरोना संसर्गामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 13:27 IST

कोरोनाबरोबर जगण्याची जीवनशैली सवय सर्वांनी अंगीकारली पाहिजे...

पुणे : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार? नववी, दहावी व बारावीचे ऑफलाइन वर्गही बंद करण्याची वेळ आली, तर परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातील ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास ऑफलाइन परीक्षा घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात कोणताही संभ्रमात राहू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांचा निकाल मागील परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, यंदा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा देऊन तयार झालेला निकाल उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत. कोरोनाबरोबर जगण्याची जीवनशैली सवय सर्वांनी अंगीकारली पाहिजे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीचे वर्ग सध्या बंद केले आहेत. मात्र, दहावी-बारावीचे वर्ग बंद करू नयेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन किती गुण मिळतात. हे त्यांना समजले पाहिजे. तसेच सध्या कोरोना व ओमायक्रॉनमुळे मुलांना कोणताही त्रास होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे उचित होईल.

- गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक, शिक्षण संचालक

दहावी बारावीच्या परीक्षांना काही अवधी आहे. दरम्यानच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक दिली जाईल. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्यात अडचण येणार नाही. कोरोनामुळे मुलांना खूपच त्रास होत असल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय स्वीकारावा.

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

परीक्षांसाठी काही कालावधी बाकी आहे. तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊन जाऊ शकते. तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहोचत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षेस अडचण येईल, असे वाटत नाही.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक, शिक्षण संचालक

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण