शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:28 IST

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली

पुणे: “नैसर्गिक संकटावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे. या आपत्तीत या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. त्यासाठी या अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदत करावी,” अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे शेतीसह जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या आणि कायमस्वरुपी मदती करावी अशी मागणी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने अमंलबजावणी करावी. वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई करण्याची गरज आहे. या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. पिकांच्या नुकसानीपोटी मदत करावीच लागेल पण जमीन वाहून गेली म्हणूनही मदत करावी लागणार आहे. गुरेढोरे वाहून गेली आहेत. याबाबत मदत न केल्यास शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील. याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मदतीचे काम वेगाने करावे लागणार आहे.”

शेतकऱ्यांना विश्वासात घ्या

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली. वासत्व पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीची आणि कायमस्वरुपी मदत देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. काही मंत्री प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. ही चांगली बाब असून शेतकरी राजा कसा उभा राहील, याकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तरच बळीराजा वाचेल, त्यातून मोठे संकट टळेल, असेही ते म्हणाले.

जे सांगतिले ते घडतेय

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामान विभागाने जे सांगितले ते घडत आहे. यंदा मे महिन्यातच मोठा पाऊस झाला. दरवर्षी असा पोऊस होत नाही. मेपासून सुरू झालेला पाऊस अजुनही सुरूच आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे. बेसावध ठेवले नाही. त्याच्या अंदाजाची माहिती त्याची नोंद राज्य सरकारने घ्यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस