शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:28 IST

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली

पुणे: “नैसर्गिक संकटावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे. या आपत्तीत या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. त्यासाठी या अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदत करावी,” अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे शेतीसह जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या आणि कायमस्वरुपी मदती करावी अशी मागणी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने अमंलबजावणी करावी. वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई करण्याची गरज आहे. या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. पिकांच्या नुकसानीपोटी मदत करावीच लागेल पण जमीन वाहून गेली म्हणूनही मदत करावी लागणार आहे. गुरेढोरे वाहून गेली आहेत. याबाबत मदत न केल्यास शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील. याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मदतीचे काम वेगाने करावे लागणार आहे.”

शेतकऱ्यांना विश्वासात घ्या

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली. वासत्व पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीची आणि कायमस्वरुपी मदत देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. काही मंत्री प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. ही चांगली बाब असून शेतकरी राजा कसा उभा राहील, याकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तरच बळीराजा वाचेल, त्यातून मोठे संकट टळेल, असेही ते म्हणाले.

जे सांगतिले ते घडतेय

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामान विभागाने जे सांगितले ते घडत आहे. यंदा मे महिन्यातच मोठा पाऊस झाला. दरवर्षी असा पोऊस होत नाही. मेपासून सुरू झालेला पाऊस अजुनही सुरूच आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे. बेसावध ठेवले नाही. त्याच्या अंदाजाची माहिती त्याची नोंद राज्य सरकारने घ्यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस