शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:28 IST

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली

पुणे: “नैसर्गिक संकटावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे. या आपत्तीत या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. त्यासाठी या अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदत करावी,” अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे शेतीसह जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या आणि कायमस्वरुपी मदती करावी अशी मागणी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने अमंलबजावणी करावी. वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई करण्याची गरज आहे. या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. पिकांच्या नुकसानीपोटी मदत करावीच लागेल पण जमीन वाहून गेली म्हणूनही मदत करावी लागणार आहे. गुरेढोरे वाहून गेली आहेत. याबाबत मदत न केल्यास शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील. याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मदतीचे काम वेगाने करावे लागणार आहे.”

शेतकऱ्यांना विश्वासात घ्या

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली. वासत्व पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीची आणि कायमस्वरुपी मदत देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. काही मंत्री प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. ही चांगली बाब असून शेतकरी राजा कसा उभा राहील, याकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तरच बळीराजा वाचेल, त्यातून मोठे संकट टळेल, असेही ते म्हणाले.

जे सांगतिले ते घडतेय

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामान विभागाने जे सांगितले ते घडत आहे. यंदा मे महिन्यातच मोठा पाऊस झाला. दरवर्षी असा पोऊस होत नाही. मेपासून सुरू झालेला पाऊस अजुनही सुरूच आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे. बेसावध ठेवले नाही. त्याच्या अंदाजाची माहिती त्याची नोंद राज्य सरकारने घ्यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस