शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार

By नितीन चौधरी | Updated: March 1, 2025 20:54 IST

महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो. शेतकरी या संदर्भात कायदेशीर लढा देऊ शकतात

पुणे : खडकवासला प्रकल्पातील धरण साठा लक्षात घेता पुणे शहराचे पाणी कायम ठेवण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सुमारे २१ टीएमसी पाणी महापालिकेला मिळणार आहे. दरम्यान, पाणीपट्टीच्या थकबाकीसंदर्भात जलसंपदा विभागाने पाणी कपातीचा दिलेला इशारा जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी शहराच्या पाण्यात कोणतीही कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महापालिका वापरत असलेल्या अतिरिक्त पाण्यासंदर्भात जलसंपदा विभाग महापालिका यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली.

पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील पाण्याच्या कोट्यासंदर्भात घेण्यात आलेल्या कालवा समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शहरातील तसेच जिल्ह्यातील आमदार, महापालिका व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा विभागाने मंजूर केलेला ११.६० टीएमसी पाणीसाठा त्यासह महापालिका नेहमीप्रमाणे उचलत असलेले जादाचे ७.९५ टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच भामा आसखेड धरणातून एक टीएमसी आणि पवना धरणातून ०.६० टीएमसी पाणीदेखील देण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. धरणामध्ये सध्या पाणीसाठा पुरेसा असल्याने कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. मात्र, महापालिका वापरत असलेले अतिरिक्त पाणी आणि त्या पोटी असलेली थकबाकी यासंदर्भात मार्च अखेरपर्यंत महापालिका २०० कोटी रुपये देणार असल्याची माहिती विखे यांनी यावेळी दिली.

शहरात वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता अतिरिक्त पाणी द्यावे लागणार आहे. मात्र, शहराला करण्यात येत असलेला पाणीपुरवठा व त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया यात विसंगती असल्याने त्यावर निर्णय होणे गरजेचे असल्याचे मत विखे यांनी व्यक्त केले. विखे म्हणाले, महापालिका पाण्याचा बेसुमार वापर करीत असून, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व आमदार, तसेच दोन्ही विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागालादेखील पाणी पुरविणे जलसंपदा विभागाचे काम आहे. महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो. शेतकरी या संदर्भात कायदेशीर लढा देऊ शकतात. त्यामुळे त्यातून तोडगा काढण्याची गरज आहे.

जलसंपदा विभागाने महापालिकेला ७१४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची नोटीस बजावली होती थकबाकी न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून पुण्याच्या पाण्यात कपात करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला होता. या संदर्भात विचारले असता विखे-पाटील यांनी पाणीकपात होणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, कालवा समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलWaterपाणीDamधरणMONEYपैसाFarmerशेतकरी