शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

देशाला तीन सरन्यायाधीश, राज्याला तीन मुख्यमंत्री देणारे पुण्यातील ILS LAW काॅलेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 15:55 IST

आयएलएसचे पी. बी. गजेंद्रगडकर, वाय. व्ही. चंद्रचूड, ई. एस. वेंकटरामय्या हे माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले

प्रशांत बिडवे 

पुणे : देशाला तीन सरन्यायाधीश, महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आणि असंख्य विधिज्ज्ञ घडविणारे शहरातील इंडियन लाॅ साेसायटी म्हणजेच ‘आयएलएस’ लाॅ कॉलेज शताब्दी वर्षांत प्रवेश करत आहे. या काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी विधीसह देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. आयएलएस काॅलेज २० जूनला शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. या महाविद्यालयाला २० जून २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

आयएलएस लाॅ काॅलेजची स्थापना २० जून १९२४ राेजी झाली होती. मागील ९९ वर्षांत काॅलेजने विधी शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला आहे. काॅलेजने असंख्य अभ्यासू वकील, न्यायाधीश घडविले आहेत. तसेच शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी भारतीय राजकारणात कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. काॅलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर विधी क्षेत्रात सर्वाेच्च कामगिरी करीत जस्टीस पी. बी. गजेंद्रगडकर (१९६४-६६), जस्टीस वाय. व्ही. चंद्रचूड (१९७७-८५) आणि जस्टीस ई. एस. वेंकटरामय्या (१९८९) हे तीन माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले.

काॅलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रातही देदीप्यमान कामगिरी केली. यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या उपपंतप्रधानपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाेते. यासाेबतच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख दाेघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रिपदीही विराजमान झाले हाेते. गाेपीनाथराव मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची कारकीर्द :- 

- पी. बी. गजेंद्रगडकर यांची १९५७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि १९६४ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. महागाई भत्ता आयोग, जम्मू आणि काश्मीर चौकशी आयोग, राष्ट्रीय श्रम आयोग तसेच बनारस हिंदू विद्यापीठ चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

- वाय. व्ही. चंद्रचूड सर्वाधिक ७ वर्षे ४ महिने सरन्यायाधीश म्हणून कार्यरत हाेते. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन काॅलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९४२ साली आयएलएस काॅलेजमधून कायद्याची पदवी मिळविली. मुंबई उच्च न्यायालयात १९६१ साली न्यायाधीश झाले. सर्वाेच्च न्यायालयात १९७२ मध्ये न्यायाधीश तर १९७७ मध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजकीय दबावाला झुगारून देत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.

- ई. एस. वेंकटरामय्या हे १९८९ मध्ये सरन्यायाधीश झाले. विधी क्षेत्रातील कारकिर्दीस १९४६ मध्ये सुरुवात केली. नाेव्हेंबर १९७० साली कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. सर्वाेच्च न्यायालयात १९७९ मध्ये न्यायाधीश आणि त्यानंतर १९८९ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्त झाले. ते कर्नाटकचे पहिले सरन्यायाधीश म्हणून ओळखले जातात.

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयadvocateवकिलSocialसामाजिकEducationशिक्षण