शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:09 IST

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे

बाभुळगाव : उजनी धरणाच्या जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडून दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. करमाळा तालुका आणि इंदापूर तालुका यांच्या मध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे .    करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोस पणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतनारा असतो. यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . 

करमाळा येथून इंदापूर कडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी शंभर किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र बोटीतून केवळ पाच ते सात किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्टकट जीवावर बेतू शकतो याचा विचार ना बोट वाले करतात, ना यातून प्रवास करणारे प्रवासी, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात. दुर्घटना झाल्यावर अलर्ट मोडवर आलेले प्रशासन पुन्हा या जलवाहतूक कडे दुर्लक्ष करते आणि पुन्हा नवीन दुर्घटना समोर येते. 

या बेकायदा बोटींवर ना लाईफ जॅकेट असतात, ना बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्याची उपकरणे असतात. बोट चालक देखील पुरेसा प्रशिक्षित नसल्याने दुर्घटने वेळी त्यालाही जीव वाचवत येत नाही. असाच प्रकार काल कुगव ते कळाशी या दरम्यान घडला आणि बोटीतून सहा जणांचा शोध वीस तासानंतर देखील लागू शकलेला नाही . 

काल उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कूगाव व झरे या गावातील असून या परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे .  करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडालेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरु आहे. काल रात्रीपासून कुगाव् व झरे गावातील गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत. भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले आहेत. झरे गावात काल रात्रीपासून शोककळा पसरली आहे. गावात सकाळपासून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रत्येकाला चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. एनडीआरएफच्या टीम कडून सकाळी पासून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. मात्र अद्यापही एकाच देखील शोध लागलेला नाही.

 झरे गावात गोकुळ दत्तात्रय जाधव हे आई, वडील, भाऊ,दोन बहिणी सोबत लहानाचे राहतात. काही वर्षांपूर्वी गोकुळचे लग्न कोमल यांच्या सोबत झाले होते. गोकुळ जाधव हे प्लम्बिंगचे काम करत आपली उपजीविका चालवत असे. आपल्या पाहुण्याच्या घरी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गोकुळ जाधव व त्यांची पत्नी कोमल, दोन चिमुकले हे काल संध्याकाळी कूगाव येथून दुपारी कळाशी कडे निघाले होते. यावेळी अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यात ही बोट उलटली आणि गोकुळ जाधव, कोमल जाधव आणि दोन्ही चिमुकले भीमा नदीच्या पात्रात बुडाले.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीSwimmingपोहणेSocialसामाजिकIndapurइंदापूर