शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:09 IST

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे

बाभुळगाव : उजनी धरणाच्या जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडून दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. करमाळा तालुका आणि इंदापूर तालुका यांच्या मध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे .    करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोस पणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतनारा असतो. यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . 

करमाळा येथून इंदापूर कडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी शंभर किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र बोटीतून केवळ पाच ते सात किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्टकट जीवावर बेतू शकतो याचा विचार ना बोट वाले करतात, ना यातून प्रवास करणारे प्रवासी, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात. दुर्घटना झाल्यावर अलर्ट मोडवर आलेले प्रशासन पुन्हा या जलवाहतूक कडे दुर्लक्ष करते आणि पुन्हा नवीन दुर्घटना समोर येते. 

या बेकायदा बोटींवर ना लाईफ जॅकेट असतात, ना बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्याची उपकरणे असतात. बोट चालक देखील पुरेसा प्रशिक्षित नसल्याने दुर्घटने वेळी त्यालाही जीव वाचवत येत नाही. असाच प्रकार काल कुगव ते कळाशी या दरम्यान घडला आणि बोटीतून सहा जणांचा शोध वीस तासानंतर देखील लागू शकलेला नाही . 

काल उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कूगाव व झरे या गावातील असून या परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे .  करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडालेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरु आहे. काल रात्रीपासून कुगाव् व झरे गावातील गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत. भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले आहेत. झरे गावात काल रात्रीपासून शोककळा पसरली आहे. गावात सकाळपासून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रत्येकाला चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. एनडीआरएफच्या टीम कडून सकाळी पासून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. मात्र अद्यापही एकाच देखील शोध लागलेला नाही.

 झरे गावात गोकुळ दत्तात्रय जाधव हे आई, वडील, भाऊ,दोन बहिणी सोबत लहानाचे राहतात. काही वर्षांपूर्वी गोकुळचे लग्न कोमल यांच्या सोबत झाले होते. गोकुळ जाधव हे प्लम्बिंगचे काम करत आपली उपजीविका चालवत असे. आपल्या पाहुण्याच्या घरी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गोकुळ जाधव व त्यांची पत्नी कोमल, दोन चिमुकले हे काल संध्याकाळी कूगाव येथून दुपारी कळाशी कडे निघाले होते. यावेळी अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यात ही बोट उलटली आणि गोकुळ जाधव, कोमल जाधव आणि दोन्ही चिमुकले भीमा नदीच्या पात्रात बुडाले.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीSwimmingपोहणेSocialसामाजिकIndapurइंदापूर