शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

छत्रपती शिवरायांच्या राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:18 IST

मार्गासनी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याकडे ...

मार्गासनी :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पुढे आले आहे.

छत्रपती शिवरायांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याचा ज्वलंत वारसा जिवंत व्हावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, वेल्हे तालुक्यातील बहुतांश गावच्या ग्रामसभेने विनंत्या, मागण्या करूनही वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करण्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका असे जाहीर करावे, असे साकडे मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे ,बाळासाहेब सणस आदीं मावळ्यांनी घातले आहे.

राजगड तालुका असे नामांतर करण्यास तालुक्यातील बहुतांश गावांचा पाठिंबा आहे, असे असताना

वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्याची कार्यवाही गेल्या वर्षभरापासून रखडलेली आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी व स्वराज्याचा पहिला तालुका राजगडाकडे दुर्लक्ष झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील राजगड हा पहिला तालुका आहे.

राजगड हा स्वतंत्र राष्ट्राचा पहिला तालुका असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढे आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यासाठी स्थानिक मावळा जवान संघटनेच्या वतीने गावोगाव अभियान राबविण्यात आले.

ग्रामसभेचे ठराव वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. त्यांनी प्रशासकीय बाबींची पूर्तता करत ठरावासह मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. त्यानंतर राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांनीही तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे म्हणाले की,

शिवकाळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत तालुका राजगड असा उल्लेख असलेल्या नोंदी व शिक्के यांचे दुर्मीळ दस्त

आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून राजगड तालुक्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार किल्ले राजगडावरून १६४८ ते १६७२ पर्यंत पंचवीस वर्षे पाहिला. शिवरायांनी परकीयांची शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. लोककल्याणकारी राज्य स्थापन करून त्याचा राज्यकारभार राजगडावरून पाहिला. लोककल्याणकारी कार्यासाठी स्थिर प्रशासन यंत्रणा उभी केली. त्यासाठी गाव, कसबा, परगणे, प्रांत, तालुका, विभाग, सुभा अशी रचना केली. स्वराज्याचा कारभार चोखपणे व्हावा यासाठी खेड्यापाड्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी तालुक्याची निर्मिती केली.

- स्वराज्यातील पहिला तालुका राजगड असल्याचे ऐतिहासिक दस्तऐवज व शिक्का.