शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

कात्रज-कोंढवा रस्त्याने जाताय, तर जरा जपूनच! १२ तासात २ अपघात, ५ वर्षांत ५८ अपघात, २६ बळी

By राजू हिंगे | Updated: August 14, 2023 15:08 IST

कात्रज - कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून रस्त्याचे रूंदीकरण कधी करणार? नागरिकांचा सवाल

पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघाताचे सत्र अदयापही सुरू आहे. या रस्त्यावर गेल्या १२ तासात दोन अपघात होउन दोन जणांचा बळी गेला आहे. आठवडयाभरात चार अपघातामध्ये चार जणाचे बळी गेले आहेत. पाच वर्षांत या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर ५८ हून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये २६ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे रूंदीकरण कधी करणार? आणखीन किती अपघात होण्याची वाट पालिका प्रशासन, वाहतुक पोलिस आणि आरटीओ पाहणार आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आरएमडी शाळेसमोर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ५ आगस्ट रोजी रात्री एका युवकाचा कटनेरच्या मागच्या चाकाखाली जाउन मृत्यू झाला होता. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कोंढवा स्मशानभूमीजवळ १० आगस्ट रोजी पुन्हा भीषण अपघात झाला. यामध्ये आठ वाहने एकमेकांवर आदळली. यात स्कूल बसचाही सामावेश होता. या अपघातात एक जण ठार झाला असून पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. कात्रज कोंढवा रस्त्यावर १३ ऑगस्ट रोजी रात्री १०च्या सुमारात एका ज्येष्ठ महिलेचा अपघातात मृत्यू झाला. १४ ऑगस्ट रोजी कोंढवा स्मशानभुमीजवळ खचलेले चेंबर आणि एमएनजीएलचे रस्त्यात खचलेले लोखंडी झाकण याला हुकविताना शेजारी चाललेल्या पादचा०यांला धक्का लागून एका ज्येष्ट नागरिकांचा मृत्यू झाला. या रस्त्यावर गेल्या १२ तासात दोन अपघात होउन दोन जणांचा बळी गेला आहे. आठवडयाभरात चार अपघातामध्ये चार जणाचे बळी गेले आहेत.

राज्यातील सत्ताधारी, पालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष

कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपी रोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. या रस्त्यांच्या कामाला २४१ कोटी दिले असून आतापर्यंत ४८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटींची आवश्यकता होती. पण, भूसंपादन न झाल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता झाला आहे. त्यापुढे या रस्त्याचे काम झालेले नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारीमार्गाचे काम सुरू आहे. पण त्यापुढेही काम झालेले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही सलग काम न झाल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यातच आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घ काळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या ८४ मीटरऐवजी आता त्याची रुंदी ५० मीटर केली जाणार आहे. यामध्ये सेवा रस्त्याचा समावेश आहे. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यासाठी २०० कोटी रूपये भुसंपादनासाठी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये २०० कोटी रूपये या रस्त्यासाठी मंजुर करण्यात आले आहे. पण या रस्त्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवेसेनेच्या शिंदे गटाच्या राज्यस्तरीय नेत्यांने बैठक घेतली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ताधा०याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

जड वाहनांना वेळेचे बंधन घाला

कात्रज-कोंढवा रस्त्याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ८ ऑगस्ट रोजी पाहणी केली. शहरात कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने भूसंपादन करा. जागा ताब्यात आल्यानंतर तातडीने काम सुरू करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते. रस्त्याचे काम वेगाने करणा०या बरोबरच या रस्त्यावर आता जड वाहनांना वेळेचे बंधन घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातkatrajकात्रजKondhvaकोंढवाSocialसामाजिकDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका