शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी सांगवी : सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडून अपुरा, अनियमित ...

कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी

सांगवी : सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडून अपुरा, अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना राबवून स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास महिला व आबालवृद्धांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच भानुदास जगताप यांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे. सध्या जिल्ह्यात सामाधानकारक पाऊस झाला असताना देखील परिसरात पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी पाण्याचा प्रश्न कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सांगवी गावात दोन दिवसांआड दूषित व अपुऱ्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. मिलिंदनगर येथे वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न कायम असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावात दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन ते चार दिवस पाणी कसे पुरवायचे हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. गावात दीड लाख क्षमतेची पाण्याची टाकी आहे. पाणीपुरवठा करत असताना पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असताना पाणी सोडल्यास पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत असतो,मात्र, टाकीतील पाणी खाली गेल्यानंतर मिलिंदनगर भागात पाणीपुरवठा होत असतो, गावात इतर ठिकाणी पूवीर्पासून जुन्या चार इंची पाईप लाईन आहेत. तर मिलिंदनगर येथे तीन इंची पाईपलाईन असल्याने आणखी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यापुढे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.

---------------------------

मिलिंदनगर परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार आहोत. तसेच जलप्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणा नंतर गावात लवकरात लवकर नवीन जलवाहिन्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- चंद्रकांत तावरे

(सरपंच सांगवी ग्रामपंचायत)

-----------------------------

सध्या केनॉलच्या कामकाजामुळे साठवण तलावात पाणी अल्प प्रमाणात असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मागील महिनाभरापूर्वी जल प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाण्याच्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावातील सर्वच जलवाहिन्यांचे नव्याने कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात पाण्याची समस्या मिटणार आहे.

- संजय चांदगुडे

(ग्रामविकास अधिकारी )