शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पावसाळा लांबल्यास पुण्यात जलसंकट, धरणातील पाणीसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:34 AM

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.वाढते तापमान आणि त्यामुळे होणºया बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. पुण्यासाठी महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. कागदावर हा साठा दिसत असला तरी उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू आहे. त्याचबरोबर कालव्याच्या लगतच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याची कसरत महापालिका आणि जलसंपदा विभागाला करावी लागणार आहे.सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. मात्र पावसाचा अंदाज बांधणे कठीण असल्याने यंदा ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा पाटबंधारे विभागाचा विचार आहे. सध्या सुरु असलेले उन्हाळी आवर्तन अजून चार ते पाच दिवस चालणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पाण्याची सद्यस्थिती बघून पुढील आवर्तन सोडायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येईल असे पाटबंधारे खात्याच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पुण्याला पाणीपुरवठा करणाºया टेमघरची क्षमता ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे.या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के म्हणजे ६.४२ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के म्हणजे १.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.\पावसाचा अंदाज अनिश्चित असल्याने यंदा १५ जुलै ऐवजी ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न असेल. सध्या पुणे महापालिका १३५० ते १४०० एमएलडीच्या दरम्यान प्रतिदिन पाणी वापरते. त्यामुळे त्यांनी पाणी बचत करण्याची गरज आहे. तसे झाल्यास पाण्याची टंचाई जाणवणार नाही.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण साखळी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीटंचाईDamधरण