शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लांबल्यास पुण्यात जलसंकट, धरणातील पाणीसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:34 IST

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.वाढते तापमान आणि त्यामुळे होणºया बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. पुण्यासाठी महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. कागदावर हा साठा दिसत असला तरी उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू आहे. त्याचबरोबर कालव्याच्या लगतच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याची कसरत महापालिका आणि जलसंपदा विभागाला करावी लागणार आहे.सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. मात्र पावसाचा अंदाज बांधणे कठीण असल्याने यंदा ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा पाटबंधारे विभागाचा विचार आहे. सध्या सुरु असलेले उन्हाळी आवर्तन अजून चार ते पाच दिवस चालणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पाण्याची सद्यस्थिती बघून पुढील आवर्तन सोडायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येईल असे पाटबंधारे खात्याच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पुण्याला पाणीपुरवठा करणाºया टेमघरची क्षमता ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे.या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के म्हणजे ६.४२ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के म्हणजे १.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.\पावसाचा अंदाज अनिश्चित असल्याने यंदा १५ जुलै ऐवजी ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न असेल. सध्या पुणे महापालिका १३५० ते १४०० एमएलडीच्या दरम्यान प्रतिदिन पाणी वापरते. त्यामुळे त्यांनी पाणी बचत करण्याची गरज आहे. तसे झाल्यास पाण्याची टंचाई जाणवणार नाही.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण साखळी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीटंचाईDamधरण