शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लांबल्यास पुण्यात जलसंकट, धरणातील पाणीसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:34 IST

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.वाढते तापमान आणि त्यामुळे होणºया बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. पुण्यासाठी महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. कागदावर हा साठा दिसत असला तरी उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू आहे. त्याचबरोबर कालव्याच्या लगतच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याची कसरत महापालिका आणि जलसंपदा विभागाला करावी लागणार आहे.सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. मात्र पावसाचा अंदाज बांधणे कठीण असल्याने यंदा ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा पाटबंधारे विभागाचा विचार आहे. सध्या सुरु असलेले उन्हाळी आवर्तन अजून चार ते पाच दिवस चालणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पाण्याची सद्यस्थिती बघून पुढील आवर्तन सोडायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येईल असे पाटबंधारे खात्याच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पुण्याला पाणीपुरवठा करणाºया टेमघरची क्षमता ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे.या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के म्हणजे ६.४२ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के म्हणजे १.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.\पावसाचा अंदाज अनिश्चित असल्याने यंदा १५ जुलै ऐवजी ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न असेल. सध्या पुणे महापालिका १३५० ते १४०० एमएलडीच्या दरम्यान प्रतिदिन पाणी वापरते. त्यामुळे त्यांनी पाणी बचत करण्याची गरज आहे. तसे झाल्यास पाण्याची टंचाई जाणवणार नाही.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण साखळी

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीटंचाईDamधरण