शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:21 IST

राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश

ठळक मुद्देमंत्र्यांनी हि यात्रा राजकारणाचा भाग होऊ नये याचा विचार करायला पाहिजे होता

पुणे : महाराष्ट्रात चार भाजप नेत्यांची जनआशीर्वाद यात्रा चालू आहे. यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन होतानाचे चित्र आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे, त्यातच आता राज्याचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यात्रेतील मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  

 जन आशिर्वाद यात्रा ही जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी असली तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेवर टीका करणे एवढाच अजेंडा या यात्रेचा ठेवला गेला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये; असे केंद्र शासनाने सांगितले असले तरी केंद्रीय मंत्रीच केंद्र शासनाचे ऐकतं नसतील तर त्यांच्यावर केंद्र शासनानेचे कारवाई करून एक आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आहेत. याबाबत उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, पेट्रोल, डिसेल ,दर केव्हा कमी होणार ? गॅसचे दर कमी करून गृहिणींना केव्हा दिलासा मिळणार ? याची उत्तरे जन आशिर्वाद यात्रा काढणा-या केंद्रीय मंत्र्याकडून कोकणाला हवी आहेत. तसेच लाखो बेरोजगार तरूणांना रोजगार केव्हा मिळणार ? त्यांच्या बँक खात्यात 15 लाख केव्हा जमा होणार? याची त्यांना प्रतिक्षा आहे. या प्रश्नांची उत्तरे देवून जन आशिर्वाद घेतला तर ती यात्रा फलदायी ठरेल,असे मला वाटते.

मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर काय होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने व टीका करणा-यांनी सुध्दा पाहिले आहे. तसेच ज्या प्रसंगासाठी टीका झाली त्या प्रसंगाला अनुसरून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. त्यावर सबंधित नेत्यांवर काय टीका करणार ? तसेच जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय करणार ? याची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत, असेही सामंत म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkonkanकोकणEducationशिक्षण