शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:21 IST

राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश

ठळक मुद्देमंत्र्यांनी हि यात्रा राजकारणाचा भाग होऊ नये याचा विचार करायला पाहिजे होता

पुणे : महाराष्ट्रात चार भाजप नेत्यांची जनआशीर्वाद यात्रा चालू आहे. यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन होतानाचे चित्र आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे, त्यातच आता राज्याचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यात्रेतील मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  

 जन आशिर्वाद यात्रा ही जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी असली तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेवर टीका करणे एवढाच अजेंडा या यात्रेचा ठेवला गेला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये; असे केंद्र शासनाने सांगितले असले तरी केंद्रीय मंत्रीच केंद्र शासनाचे ऐकतं नसतील तर त्यांच्यावर केंद्र शासनानेचे कारवाई करून एक आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आहेत. याबाबत उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, पेट्रोल, डिसेल ,दर केव्हा कमी होणार ? गॅसचे दर कमी करून गृहिणींना केव्हा दिलासा मिळणार ? याची उत्तरे जन आशिर्वाद यात्रा काढणा-या केंद्रीय मंत्र्याकडून कोकणाला हवी आहेत. तसेच लाखो बेरोजगार तरूणांना रोजगार केव्हा मिळणार ? त्यांच्या बँक खात्यात 15 लाख केव्हा जमा होणार? याची त्यांना प्रतिक्षा आहे. या प्रश्नांची उत्तरे देवून जन आशिर्वाद घेतला तर ती यात्रा फलदायी ठरेल,असे मला वाटते.

मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर काय होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने व टीका करणा-यांनी सुध्दा पाहिले आहे. तसेच ज्या प्रसंगासाठी टीका झाली त्या प्रसंगाला अनुसरून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. त्यावर सबंधित नेत्यांवर काय टीका करणार ? तसेच जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय करणार ? याची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत, असेही सामंत म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkonkanकोकणEducationशिक्षण