शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा

By राजू हिंगे | Updated: September 26, 2024 15:50 IST

राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा

पुणे : जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र मोदी यांचा पुणे दौरा रदद झाला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्ग आज सुरू झाला नाही तर शु्क्रवारी या मार्गाचे औपचारिक उदघाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येईल. या मार्गावर मेट्रो सुरू न केल्यास मेट्रो अधिका०यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटना येत आहेत या कार्यक्रमांमुळे कोट्यावधींचा चुराडा होत आहे. हा रद्द झाला असला तरी कोट्यावधींचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बसून हे उद्घाटन करता आले असते यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारे उद्घाटन केली आहे. आता राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा आणि पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊन लोकांच्या पैशाचा चुराडा करू नये अशी मागणी सरकारकडे धंगेकर यांनी केले आहे. मेट्रोमध्ये जे पक्षीय राजकारण सुरू आहे. ते अत्यंत निंदणी आहे. काँग्रेस पक्षाने मेट्रोचा डीपी आर केला. मेट्रोची सुरुवात देखील काँग्रेसने केली मात्र कधीही जाहिरात बाजी केली नाही. त्यामुळे आता भाजप सरकारने ही जाहिरातीवर होणारा खर्च टाळावा आणि टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना उद्घाटनांना न बोलावता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन करावीत असे धंगेकर यांनी सांगितले.

मोदीं यांना विचारले दहा प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारताना भष्ट्राचार झाला आहे. त्यामुळे केवळ माफी मागुन प्रश्न मिटले का ? राज्यात रोज २१ महिलावर बलात्कार होत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण सुरक्षित का नाही ? २० हजार ७६२ प्रकरणासह महाराष्ट्र मुलांवरील गुन्हयामध्ये पहिल्या क्रमांकारवर आहे. बदलापुर सारख्या घटनाकडे तूमचे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुल खरंच सुरक्षित आहेत ? गेल्या दहा वर्षात राज्यातील २० हजारापेक्षा जास्त शेतक०यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुमच सरकार हे संकट का सोडवु शकत नाही ? पुणे पोर्श प्रकरण आणि बावनकुळे हिट ॲन्ड रन प्रकरणात हे दिसले की तुमच्या सरकारने तुमच्या मित्रांना गुन्हापासुन दुर ठेवले. तलाठी घोटाळ आणि नीट घोटाळा हे फक्त हिमनगाचे टोक आहे. तुमच्या काळात अजुन किती घोटाळे समोर येणार आहेत. ?बरोजोगारामुळे महाराष्ट् तरूणांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या इतिहासातच प्रथमच २७ महपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तुमच्या सरकारने निवडणुक न घेउन लोकशाहीचा गळा घोटला आहे असे दहा प्रश्न आमदार रविंद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीcongressकाँग्रेसBJPभाजपाSocialसामाजिकagitationआंदोलन