शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा

By राजू हिंगे | Updated: September 26, 2024 15:50 IST

राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा

पुणे : जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र मोदी यांचा पुणे दौरा रदद झाला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्ग आज सुरू झाला नाही तर शु्क्रवारी या मार्गाचे औपचारिक उदघाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येईल. या मार्गावर मेट्रो सुरू न केल्यास मेट्रो अधिका०यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटना येत आहेत या कार्यक्रमांमुळे कोट्यावधींचा चुराडा होत आहे. हा रद्द झाला असला तरी कोट्यावधींचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बसून हे उद्घाटन करता आले असते यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारे उद्घाटन केली आहे. आता राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा आणि पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊन लोकांच्या पैशाचा चुराडा करू नये अशी मागणी सरकारकडे धंगेकर यांनी केले आहे. मेट्रोमध्ये जे पक्षीय राजकारण सुरू आहे. ते अत्यंत निंदणी आहे. काँग्रेस पक्षाने मेट्रोचा डीपी आर केला. मेट्रोची सुरुवात देखील काँग्रेसने केली मात्र कधीही जाहिरात बाजी केली नाही. त्यामुळे आता भाजप सरकारने ही जाहिरातीवर होणारा खर्च टाळावा आणि टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना उद्घाटनांना न बोलावता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन करावीत असे धंगेकर यांनी सांगितले.

मोदीं यांना विचारले दहा प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारताना भष्ट्राचार झाला आहे. त्यामुळे केवळ माफी मागुन प्रश्न मिटले का ? राज्यात रोज २१ महिलावर बलात्कार होत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण सुरक्षित का नाही ? २० हजार ७६२ प्रकरणासह महाराष्ट्र मुलांवरील गुन्हयामध्ये पहिल्या क्रमांकारवर आहे. बदलापुर सारख्या घटनाकडे तूमचे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुल खरंच सुरक्षित आहेत ? गेल्या दहा वर्षात राज्यातील २० हजारापेक्षा जास्त शेतक०यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुमच सरकार हे संकट का सोडवु शकत नाही ? पुणे पोर्श प्रकरण आणि बावनकुळे हिट ॲन्ड रन प्रकरणात हे दिसले की तुमच्या सरकारने तुमच्या मित्रांना गुन्हापासुन दुर ठेवले. तलाठी घोटाळ आणि नीट घोटाळा हे फक्त हिमनगाचे टोक आहे. तुमच्या काळात अजुन किती घोटाळे समोर येणार आहेत. ?बरोजोगारामुळे महाराष्ट् तरूणांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या इतिहासातच प्रथमच २७ महपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तुमच्या सरकारने निवडणुक न घेउन लोकशाहीचा गळा घोटला आहे असे दहा प्रश्न आमदार रविंद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीcongressकाँग्रेसBJPभाजपाSocialसामाजिकagitationआंदोलन