शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

शेतकरी जगला तर आपण जगू : डॉ. सदानंद मोरे; प्रा. बळवंतराव जगताप यांचा पुण्यात सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:29 PM

शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात ते बोलत होते.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष गौरवजगताप यांच्या ‘मनातले कागदावर’ या पुस्तकाचे यावेळी झाले प्रकाशन

पुणे : हिमालयापासून केरळच्या समुद्रापर्यंत आपला देश हा खंडप्राय देश आहे. जगातील सर्व देशातील कृषी भिन्नतेचा आविष्कार आपल्या देशात आहे. भारतातील ही शेती म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. पिकविणे ही एक निर्मिती आहे. त्यामुळे शेतकरी हा निर्मितीशील आणि पोशिंदा देखील आहे. शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने कृषीतज्ज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जगताप यांच्या ‘मनातले कागदावर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, आनंद कोठडिया, शेखर गायकवाड, प्रा. डॉ. पी. एन. रसाळ, अ‍ॅड. अशोक पवार, विकास देशमुख यावेळी उपस्थित होते. राम ताकवले म्हणाले, ‘शेती करणारा माणूस कोण आहे हे पाहिले जात नाही. तिथे प्रत्येकजण समान असतो. ही समानता शहरातील माणसामध्ये दिसत नाही. कृतीशी शिक्षणाचा संबंध लावायला हवा. जे शिक्षण कृतीशील असते, तेच शाश्वत असते. जे शिक्षण तुम्हाला समाज ज्ञान देते, तेच तुमच्या जीवनात उपयोगी असते.’ प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंतराव मोहिते यांनी आभार मानले.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे