शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पुण्यातील कोरोना लाट ओसरण्याचं श्रेय फक्त महापालिकेला कसं? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 18:44 IST

पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे ही बाब जरी खरी असली तरी त्याचे संपूर्ण श्रेय फक्त महापालिकेचे नाही.

पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे श्रेय महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्याांनी महापालिका प्रशासनाने राबविलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले आहेत. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाले नसते तरच नवल. काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत श्रेयवादाच्या लढाईत काँग्रेसने उडी घेतली आहे.

पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मार्च, एप्रिल आणि मे च्या सुरुवातीपर्यंत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा वेग प्रशासन आणि पुणेकरांमध्ये धडकी भरविणारा होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट आढळून आली आहे. परंतू,आता यावरून श्रेयवादाचा नवीन वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

तिवारी म्हणाले, पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे ही बाब जरी खरी असली तरी त्याचे संपूर्ण श्रेय फक्त महापालिकेचे नसून राज्य सरकार, प्रशासन आणि प्रत्येक पुणेकराने दाखविलेल्या संयमामुळे हे शक्य होत आहे. त्यामुळे या घटकांना देखील कोरोना लाट कमी होण्याचं श्रेय निश्चितच द्यावे लागेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत महापालिकेसह प्रत्येक नागरिकाने आपलं योगदान दिले आहे. काहींच्या कुटुंबावर तर जवळची व्यक्ती गमावल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत फक्त महापालिकेला श्रेय दिले गेले तर ते इतर घटकांचा अपमानित केल्यासारखे होईल. 

पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यावर गोपाळ तिवारी म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊन निर्बंध कमी करून दुकाने उघडण्याची मागणी होणे साहजिक आहे. मुळात पुणे आणि मुंबई हे उद्योगधंद्यांच्या दृष्टीने महत्वाची शहरे आहे. राज्यातील बरेच आर्थिक गणित य दोन शहरांवर अवलंबून आहे. त्यामुळे इथले उद्योग सुरू झाले होणे गरजेचे आहे. मात्र, उद्योग धंद्यांना परवानगी देताना संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे असे मत तिवारी यांनी व्यक्त केले. तसेच लॉकडाऊन संबंधीचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेईल असेही यावेळी ते म्हणाले.

भाजप नेत्यांच्या आश्वासनांचं पुढं काय झालं? 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळात पक्षाच्या वतीने 2000 खाटांचे उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.. मात्र ते आश्वासनाचं पुढे काय झालं? केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यासाठी व्हेंटिलेटर देणार होते, त्याचं काय झालं..? असाही सवाल तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण