शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पुण्यातील कोरोना लाट ओसरण्याचं श्रेय फक्त महापालिकेला कसं? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 18:44 IST

पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे ही बाब जरी खरी असली तरी त्याचे संपूर्ण श्रेय फक्त महापालिकेचे नाही.

पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे श्रेय महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्याांनी महापालिका प्रशासनाने राबविलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले आहेत. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाले नसते तरच नवल. काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत श्रेयवादाच्या लढाईत काँग्रेसने उडी घेतली आहे.

पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मार्च, एप्रिल आणि मे च्या सुरुवातीपर्यंत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा वेग प्रशासन आणि पुणेकरांमध्ये धडकी भरविणारा होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट आढळून आली आहे. परंतू,आता यावरून श्रेयवादाचा नवीन वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

तिवारी म्हणाले, पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे ही बाब जरी खरी असली तरी त्याचे संपूर्ण श्रेय फक्त महापालिकेचे नसून राज्य सरकार, प्रशासन आणि प्रत्येक पुणेकराने दाखविलेल्या संयमामुळे हे शक्य होत आहे. त्यामुळे या घटकांना देखील कोरोना लाट कमी होण्याचं श्रेय निश्चितच द्यावे लागेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत महापालिकेसह प्रत्येक नागरिकाने आपलं योगदान दिले आहे. काहींच्या कुटुंबावर तर जवळची व्यक्ती गमावल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत फक्त महापालिकेला श्रेय दिले गेले तर ते इतर घटकांचा अपमानित केल्यासारखे होईल. 

पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यावर गोपाळ तिवारी म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊन निर्बंध कमी करून दुकाने उघडण्याची मागणी होणे साहजिक आहे. मुळात पुणे आणि मुंबई हे उद्योगधंद्यांच्या दृष्टीने महत्वाची शहरे आहे. राज्यातील बरेच आर्थिक गणित य दोन शहरांवर अवलंबून आहे. त्यामुळे इथले उद्योग सुरू झाले होणे गरजेचे आहे. मात्र, उद्योग धंद्यांना परवानगी देताना संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे असे मत तिवारी यांनी व्यक्त केले. तसेच लॉकडाऊन संबंधीचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेईल असेही यावेळी ते म्हणाले.

भाजप नेत्यांच्या आश्वासनांचं पुढं काय झालं? 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळात पक्षाच्या वतीने 2000 खाटांचे उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.. मात्र ते आश्वासनाचं पुढे काय झालं? केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यासाठी व्हेंटिलेटर देणार होते, त्याचं काय झालं..? असाही सवाल तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण