शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला पावसाचा मोठा फटका; ७६ जणांचा मृत्यू तर ५९ जण बेपत्ता; ९० हजार लोकांचं स्थलांतर : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:53 IST

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे.

पुणे : राज्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे. तसेच नऊ जिल्हे पूरबाधित आहे. या दरम्यान ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ लोकं बेपत्ता आहेत. तसेच जखमींचा आकडा ३८ वर असल्याची माहिती आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे. ही पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यामागे जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान ९० हजार लोकांना स्थलांतरित केले आहे. सध्या राज्यात एनडीआरएफचे २१ पथक कार्यरत आहे. लष्कर आणि नौदलाची इतर १४ पथके देखील आहे. एनडीआरएफच्या ४८ आणि इतर अशा एकूण ५९ बोटी मदतीला असुंन त्यांच्या मार्फत मदतकार्य सुरु आहे.तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबांना तांदूळ, डाळ आणि रॉकेल देणार तसेच काही ठिकाणी शिवभोजन थाळीही सुरू करणार आहे. सगळ्या पालकमंत्र्यांना आपापल्या भागात थांबण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांना व आम्हाला देत आहेत. धरणाच्या खोलीकरणाचा आणि आताच्या पूरस्थितीचा काहीही संबंध नाही. सगळीकडेच पाऊस जास्त झाला, त्यामुळे काहीच करता येत नाही अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. 

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. वाई तालुक्यात कोंडविडे, मौजेघर, महाड येथील तळीये, पोलादपूरमध्ये साखर, सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी यासारख्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घाटातही दरडी कोसळल्या असून घाट बंद करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरडप्रवण गावांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावांचे दुसरीकडे स्थलांतर करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

तळीये गाव दरडप्रवण क्षेत्रात येत नाही 

दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते, त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.-----आमचे दुसरीकडे स्थलांतर करा

आमचे दुसरीकडे स्थलांतर करा, अशी मागणी या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि घडलेल्या घटनांमुळे हे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे नागरिक स्थलांतराची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारfloodपूरRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार