शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

राज्याला पावसाचा मोठा फटका; ७६ जणांचा मृत्यू तर ५९ जण बेपत्ता; ९० हजार लोकांचं स्थलांतर : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:53 IST

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे.

पुणे : राज्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे. तसेच नऊ जिल्हे पूरबाधित आहे. या दरम्यान ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ लोकं बेपत्ता आहेत. तसेच जखमींचा आकडा ३८ वर असल्याची माहिती आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे. ही पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यामागे जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान ९० हजार लोकांना स्थलांतरित केले आहे. सध्या राज्यात एनडीआरएफचे २१ पथक कार्यरत आहे. लष्कर आणि नौदलाची इतर १४ पथके देखील आहे. एनडीआरएफच्या ४८ आणि इतर अशा एकूण ५९ बोटी मदतीला असुंन त्यांच्या मार्फत मदतकार्य सुरु आहे.तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबांना तांदूळ, डाळ आणि रॉकेल देणार तसेच काही ठिकाणी शिवभोजन थाळीही सुरू करणार आहे. सगळ्या पालकमंत्र्यांना आपापल्या भागात थांबण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांना व आम्हाला देत आहेत. धरणाच्या खोलीकरणाचा आणि आताच्या पूरस्थितीचा काहीही संबंध नाही. सगळीकडेच पाऊस जास्त झाला, त्यामुळे काहीच करता येत नाही अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. 

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. वाई तालुक्यात कोंडविडे, मौजेघर, महाड येथील तळीये, पोलादपूरमध्ये साखर, सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी यासारख्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घाटातही दरडी कोसळल्या असून घाट बंद करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरडप्रवण गावांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावांचे दुसरीकडे स्थलांतर करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

तळीये गाव दरडप्रवण क्षेत्रात येत नाही 

दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते, त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.-----आमचे दुसरीकडे स्थलांतर करा

आमचे दुसरीकडे स्थलांतर करा, अशी मागणी या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि घडलेल्या घटनांमुळे हे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे नागरिक स्थलांतराची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारfloodपूरRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार