शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 11:46 IST

हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, अजून पाऊस न आल्यामुळे शेतकरी संकटात

ओतूर : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बरसलेल्या पावसाने मागील दोन आठवड्यांपासून दाडी मारली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने 'यलो अलर्ट'चा इशारा दिला होता. दिवसांच्या पावसाच्या अंदाजाचे ढग आले, मात्र बरसले नाही. पावसासाठी तहानलेल्या ओतूर व परिसरातील गावातील लोकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा असताना मुसळधार तर नाही, मात्र घामाच्या धारांनी ओतूर व परिसरातील लोक बेजार होत आहेत.तालुक्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ऊन-पावसाच्या या लपंडावात घामाच्या धारा, खंडित वीजपुरवठ्याने माळशेज परिसराच्या गावातील लोक त्रस्त झाले आहेत.

प्रादेशिक हवामान खात्याने पुन्हा दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मात्र, मागील चार दिवसांचा अनुभव बघता या दोन दिवसांत तरी तालुक्यात पावसाच्या सरी बरसतील की नाही, याची शाश्वती नाही. मंगळवार, बुधवार दिवसभर दमट वातावरण व उकाड्याने घामाच्या धारांनी भिजविले. दुपारच्या वेळी सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. तर, काही ठिकाणी तुषार पडल्यासारखा पाऊस झाला. मात्र, मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही प्रतीक्षाच ठरली. आतापर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली आहे. १०० मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. मात्र, जून महिन्याच्या शेवटी बरसलेला पाऊस व जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, रुसलेल्या वरुणराजाने मात्र दांडी मारली आहे. पावसाचा पत्ता नसतानाही माळशेज वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. पावसाचा सुरू असलेला लपंडाव यामुळे ओतूर परिसराच्या गावातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. कारण विहिरीचे, बोअरवेलचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

माळशेज परिसरात तुरळक पाऊस झाला होता. त्या पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी महागामोलाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. आता उतार झाला परंतु तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस हवामान खात्याचा अंदाज चुकत गेल्याने आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे करण्याची वेळ येते की काय असे वाटू लागले आहे. हवामानतज्ज्ञांनी पावसाविषयी केलेला अंदाज शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारा ठरत आहे. प्रत्येक हवामानतज्ज्ञांनी वर्तविलेले अंदाज यावेळी पूर्णता चुकीचे ठरले आहेत. हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, आज रोजी पाऊस न आल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीenvironmentपर्यावरणWaterपाणीDamधरण