शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 11:46 IST

हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, अजून पाऊस न आल्यामुळे शेतकरी संकटात

ओतूर : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बरसलेल्या पावसाने मागील दोन आठवड्यांपासून दाडी मारली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने 'यलो अलर्ट'चा इशारा दिला होता. दिवसांच्या पावसाच्या अंदाजाचे ढग आले, मात्र बरसले नाही. पावसासाठी तहानलेल्या ओतूर व परिसरातील गावातील लोकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा असताना मुसळधार तर नाही, मात्र घामाच्या धारांनी ओतूर व परिसरातील लोक बेजार होत आहेत.तालुक्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ऊन-पावसाच्या या लपंडावात घामाच्या धारा, खंडित वीजपुरवठ्याने माळशेज परिसराच्या गावातील लोक त्रस्त झाले आहेत.

प्रादेशिक हवामान खात्याने पुन्हा दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मात्र, मागील चार दिवसांचा अनुभव बघता या दोन दिवसांत तरी तालुक्यात पावसाच्या सरी बरसतील की नाही, याची शाश्वती नाही. मंगळवार, बुधवार दिवसभर दमट वातावरण व उकाड्याने घामाच्या धारांनी भिजविले. दुपारच्या वेळी सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. तर, काही ठिकाणी तुषार पडल्यासारखा पाऊस झाला. मात्र, मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही प्रतीक्षाच ठरली. आतापर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली आहे. १०० मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. मात्र, जून महिन्याच्या शेवटी बरसलेला पाऊस व जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, रुसलेल्या वरुणराजाने मात्र दांडी मारली आहे. पावसाचा पत्ता नसतानाही माळशेज वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. पावसाचा सुरू असलेला लपंडाव यामुळे ओतूर परिसराच्या गावातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. कारण विहिरीचे, बोअरवेलचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

माळशेज परिसरात तुरळक पाऊस झाला होता. त्या पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी महागामोलाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. आता उतार झाला परंतु तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस हवामान खात्याचा अंदाज चुकत गेल्याने आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे करण्याची वेळ येते की काय असे वाटू लागले आहे. हवामानतज्ज्ञांनी पावसाविषयी केलेला अंदाज शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारा ठरत आहे. प्रत्येक हवामानतज्ज्ञांनी वर्तविलेले अंदाज यावेळी पूर्णता चुकीचे ठरले आहेत. हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, आज रोजी पाऊस न आल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीenvironmentपर्यावरणWaterपाणीDamधरण