शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बळीराजाला आनंदाचे दिवस! देशासहित राज्यात चांगला पाऊस पडणार, वराहमिहिरांच्या संकेतानुसार भाकीत

By श्रीकिशन काळे | Updated: May 31, 2024 19:05 IST

ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने अभ्यास करून राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली माहिती

पुणे : यंदा देशभरात चांगला पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी, उत्तर महाराष्ट्रातही चांगला आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे. ग्रहांच्या युतीवरून आणि वराहमिहिर यांच्या संकेतानूसार हे भाकीत करण्यात येत आहे, अशी माहिती पर्जन्य अभ्यासक व हायटेक बायोसायन्सेस इंडियाचे अध्यक्ष डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) ‘वेध पर्जन्यमानाचा : आधार प्राचीन वाड्:मयाचा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी भांडारकर संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक जोशी उपस्थित होते.

डॉ. गायकैवारी म्हणाले, ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने आम्ही अभ्यास केला आहे. होळी आणि अक्षयतृतीया या दोन दिवशी वाऱ्याची दिशा कशी आहे, त्यानूसार ठरवतो की, त्या स्थानिक पातळीवर कसा पाऊस असेल. याबद्दलचे अंदाज वर्तविता येतो. हा अंदाज ८० ते ९० टक्के बरोबर येतो. याचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा.

कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबत आयएमडी सांगत नाही. परंतु, या पध्दतीने ते सांगता येईल. त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’’ ‘‘कुठले धान्य लावावे, काेणत्या धान्याला भाव येईल, याचे आर्थिक गणित वराहमिहीर यांनी लावलेला आहे. त्या काळात बारा बालुतेदारांवर आर्थिक व्यवस्था होती. त्यामुळे त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून पावसाबद्दल भाकीते केली आहेत. या सर्वांचा अभ्यास आम्ही करतोय आणि त्यावर गणितीय पध्दत विकसित करत आहोत. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी आणि पुढील काही वर्षांतील नोंदी याचा मेळ घालून आम्ही पावसाबाबत अभ्यास करतोय,’’ असे गायकैवारी म्हणाले.

मराठवाड्यात चांगला पाऊस !

यंदा त्रिवेंद्रमला २८ मे रोजी पाऊस आला, तर तळकोकणात रत्नागिरीत ५ ते ७ मे रोजी येईल. पुण्यामध्ये तो ८ ते १० मे दरम्यान येईल, तर १८ ऑक्टोंबर रोजी मॉन्सून परतेल. या हंगामात महाराष्ट्रात १५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड पडेल. धरणांमध्ये चांगला पाऊस असणार आहे, तर खान्देश परिसरात कमी पाऊस असेल. मराठवाड्यात मात्र चांगला पाऊस आहे, असे डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी सांगितले. त्या-त्या भागातील सरासरीनूसार हा कमी-अधिक अंदाज आहे.

पाचव्या शतकात २२ डिसेंबरला संक्रांत होती. त्या दिवशी दिवस मोठा व्हायला लागला. सूर्यास्त पुढे जायला लागला आणि सूर्यास्त अलिकडे यायला लागला. आता लक्षात येतेय की, सूर्यादय आणि सूर्यास्त एक मिनिटांनी पुढे जात आहे. पण दिनमान तेच राहते. ८६ वर्षांसाठी हा पॅटर्न राहणार आहे. दिवस वाढतोय म्हटल्यावर उन्हाळा वाढायला हवा होता. आज मार्च संपेपर्यंत थंडी जाणवते. हा जो परिणाम आहे तो पावसावर होणार आहे का ? त्याचा अभ्यास करायला हवा. - डॉ. राघवेंद्र गायकैवारी, अध्यक्ष, हायटेक बायोसायन्सेस इंडिया.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीTemperatureतापमानscienceविज्ञानSocialसामाजिक