शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

यंदा बळीराजाला आनंदाचे दिवस! देशासहित राज्यात चांगला पाऊस पडणार, वराहमिहिरांच्या संकेतानुसार भाकीत

By श्रीकिशन काळे | Updated: May 31, 2024 19:05 IST

ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने अभ्यास करून राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली माहिती

पुणे : यंदा देशभरात चांगला पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी, उत्तर महाराष्ट्रातही चांगला आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे. ग्रहांच्या युतीवरून आणि वराहमिहिर यांच्या संकेतानूसार हे भाकीत करण्यात येत आहे, अशी माहिती पर्जन्य अभ्यासक व हायटेक बायोसायन्सेस इंडियाचे अध्यक्ष डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) ‘वेध पर्जन्यमानाचा : आधार प्राचीन वाड्:मयाचा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी भांडारकर संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक जोशी उपस्थित होते.

डॉ. गायकैवारी म्हणाले, ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने आम्ही अभ्यास केला आहे. होळी आणि अक्षयतृतीया या दोन दिवशी वाऱ्याची दिशा कशी आहे, त्यानूसार ठरवतो की, त्या स्थानिक पातळीवर कसा पाऊस असेल. याबद्दलचे अंदाज वर्तविता येतो. हा अंदाज ८० ते ९० टक्के बरोबर येतो. याचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा.

कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबत आयएमडी सांगत नाही. परंतु, या पध्दतीने ते सांगता येईल. त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’’ ‘‘कुठले धान्य लावावे, काेणत्या धान्याला भाव येईल, याचे आर्थिक गणित वराहमिहीर यांनी लावलेला आहे. त्या काळात बारा बालुतेदारांवर आर्थिक व्यवस्था होती. त्यामुळे त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून पावसाबद्दल भाकीते केली आहेत. या सर्वांचा अभ्यास आम्ही करतोय आणि त्यावर गणितीय पध्दत विकसित करत आहोत. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी आणि पुढील काही वर्षांतील नोंदी याचा मेळ घालून आम्ही पावसाबाबत अभ्यास करतोय,’’ असे गायकैवारी म्हणाले.

मराठवाड्यात चांगला पाऊस !

यंदा त्रिवेंद्रमला २८ मे रोजी पाऊस आला, तर तळकोकणात रत्नागिरीत ५ ते ७ मे रोजी येईल. पुण्यामध्ये तो ८ ते १० मे दरम्यान येईल, तर १८ ऑक्टोंबर रोजी मॉन्सून परतेल. या हंगामात महाराष्ट्रात १५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड पडेल. धरणांमध्ये चांगला पाऊस असणार आहे, तर खान्देश परिसरात कमी पाऊस असेल. मराठवाड्यात मात्र चांगला पाऊस आहे, असे डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी सांगितले. त्या-त्या भागातील सरासरीनूसार हा कमी-अधिक अंदाज आहे.

पाचव्या शतकात २२ डिसेंबरला संक्रांत होती. त्या दिवशी दिवस मोठा व्हायला लागला. सूर्यास्त पुढे जायला लागला आणि सूर्यास्त अलिकडे यायला लागला. आता लक्षात येतेय की, सूर्यादय आणि सूर्यास्त एक मिनिटांनी पुढे जात आहे. पण दिनमान तेच राहते. ८६ वर्षांसाठी हा पॅटर्न राहणार आहे. दिवस वाढतोय म्हटल्यावर उन्हाळा वाढायला हवा होता. आज मार्च संपेपर्यंत थंडी जाणवते. हा जो परिणाम आहे तो पावसावर होणार आहे का ? त्याचा अभ्यास करायला हवा. - डॉ. राघवेंद्र गायकैवारी, अध्यक्ष, हायटेक बायोसायन्सेस इंडिया.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीTemperatureतापमानscienceविज्ञानSocialसामाजिक