शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या बारामतीला दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: September 2, 2015 04:09 IST

आॅगस्ट संपला तरी बारामती तालुक्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. जिरायती भागातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. भूजलपातळी खालावल्याने

महेंद्र कांबळे, बारामतीआॅगस्ट संपला तरी बारामती तालुक्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. जिरायती भागातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. भूजलपातळी खालावल्याने बोअरवेल्स बंद पडल्या आहेत. तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यात सध्या २२ हजार १७९ लोकांना ११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १० सरकारी, १ खासगी टँकरद्वारे दिवसात ४७ खेपा केल्या जात आहेत. सुपे परगण्यातील वढाणे ते शिर्सुफळ अशी २० गावे, जोगवडी ते कऱ्हावागजपर्यंतची २२ गावे अशी ४२ गावे सतत पाणीटंचाईच्या छायेत असतात. मागील ४ वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने या भागातील शेतीची परिस्थिती फारच अडचणीची असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. तालुक्यातील पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, जोगवडी, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, कानाडीवाडी, मोरगाव, तरडोली, सायबाचीवाडी, आंबी बुद्रुक, माळवाडी, भिलारवाडी, मुढाळे, जळकेवाडी, जळगाव, कडेपठार, कऱ्हावागज या गावांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. चार वर्षांपासून पाऊस नाही. तरडोली, लोणीभापकर, पळशी, सायबाचीवाडी, भोईटेवाडी या भागात पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठे पाझर तलाव आहेत. मागील चार वर्षांपासून पाझर तलावात पाणीच आलेले नाही. कऱ्हा नदीवरील बंधारे कोरडे पडले आहेत. यासंदर्भात लोणीभापकर येथील दत्तात्रय बारवकर यांनी सांगितले, की शेतीच्या पाण्याचा प्रश्न मागील चार वर्षांपासून आहे. गाव सोडून जावे, असे सतत वाटते. पाण्यासाठी शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले आहे. बारामती तालुक्यातील हे विदारक चित्र आहे. या २२ गावांना पाणी मिळण्यासाठी अंध शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानुसार तब्बल ६८ कोटी रुपये तातडीने पाणी मिळण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी खर्च केले. वर्षापूर्वी भोईटेवाडी तलावात पुरंदर उपसाचे पाणी सोडण्यात आले. त्यासाठी आश्वासनपूर्ती केल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर आजअखेर पुरंदरचे पाणी पुन्हा मिळालेले नाही.