शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

थापांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारला दुष्काळ दिसेना- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 01:32 IST

केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही.

खेड/राजगुरुनगर : ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे,’’ अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.राजगुरुनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारकाचे अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या प्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार नीलम गोºहे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार शेतकºयांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही. योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे.’’ केवळ गाजराची शेती बहरली आहे, असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतकºयांना फसविण्यात आले.खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, ‘‘खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत; मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्या वेळेस त्यांनी तिन्ही शहिदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज ४० वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ. आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.’’या वेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वांत आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले; मात्र आपण केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून त्याला ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणाºया पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे, असे ते म्हणाले. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी आभार मानले.>अजित पवारांना धरणांकडे फिरकू देऊ नकासध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते, कारण धरणे सुकू लागली आहेत. धरणांच्या आजूबाजूलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका, अशी उपरोधिक टीका त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकारविरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचे ठाकरे म्हणाले. भगव्याचे राज्य येणारच, असे सांगून बैलगाडा शर्यत सुरू करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे