शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

लम्पी आजाराच्या साथीकडे सरकारचे दुर्लक्ष; राजू शेट्टी यांची उच्च न्यायालयात धाव

By नम्रता फडणीस | Updated: October 11, 2022 18:16 IST

गायी-म्हशींसारख्या पाळीव जनावरांसाठी ‘लम्पी’ आजार जीवघेणा ठरतोय

पुणे : गायी-म्हशींसारख्या पाळीव जनावरांसाठी ‘लम्पी’ आजार जीवघेणा ठरत आहे. तरीही, या त्वचा आजाराच्या साथीकडे सरकार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

या याचिकेत राज्याचा पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था पुणे, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्यासह मलकापूर तालुक्यातील भालेगावचे सरपंच तेजस घुले पाटील, नगरमधील सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, सांगली जिल्ह्यातील शेतकरी संपतराव पवार यांनी शेतकऱ्यांचे व्यापक जनहित लक्षात घेऊन अॅड. असीम सरोदे, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अक्षय देसाई यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात ‘लम्पी’ आजाराचे संक्रमण वेगाने होत असून, मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी व दूध देणारी जनावरे मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या आजाराच्या भयानकतेकडे सरकारने नीट लक्ष दिले नसून, बेजबाबदार पद्धतीने केवळ घोषणा केल्या जात असल्याचे निरीक्षण याचिकेत मांडण्यात आले आहे.

''जनावरांसाठी प्राणघातक ठरणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान करणाऱ्या ‘लम्पी’ आजारावर सरकारने तत्काळ उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पशु हक्कांचे संरक्षण करणे हे राज्यघटनेचे मूल्य असून, त्यासाठी आम्ही ही याचिका दाखल केली आहे. - अॅड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील''

याचिकेतील मागण्या

- प्राण्यांमधील साथींचे आजार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यानुसार यंत्रणा उभारण्यात यावी.- पशुवैद्यकीय तज्ज्ञांसाठी आदर्श कार्यप्रणाली करण्यात यावी.- पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी व पदविकाधारक डॉक्टरांना ‘लम्पी आजार योद्धे’ म्हणून अधिकार, सुविधा व संरक्षण द्यावे.- पशुवैद्यकीय शिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमात बदल करावेत.- लम्पी आजाराने मृत झालेल्या प्रत्येक गायी-गुरांसाठी दीड लाख रुपये भरपाई द्यावी.- ‘लम्पी’ आजाराच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, यासाठी सरकारने पावले उचलावीत.- पाळीव प्राण्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारSocialसामाजिकFarmerशेतकरी