शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, इंदापुरात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 19:58 IST

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली....

इंदापूर (पुणे) : राजकीय कारणातून छगन भुजबळ या व्यक्तीविषयी राग असू शकतो, मात्र सर्व ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी तरी सर्व राजकीय पक्षांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात बोलताना शनिवारी ( दि.९) केले. या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकरही आले होते. हा मेळावा आटोपून परत जाताना आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रशासकीय भवनाच्या भिंतीजवळ सुरु असणाऱ्या दीपक काटे यांच्या दुधदराविषयी सुरु असणाऱ्या उपोषण आंदोलनास भेट दिली. त्या वेळी काटे यांच्या शेजारी सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांनी गो बॅक च्या घोषणा दिल्या. त्यांच्या दिशेने चप्पल व बुट भिरकावल्याची घटना घडली.

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. महसूल व पोलीस प्रशासनाला निर्वाणीचे इशारे ही दिले. ते म्हणाले की,आमचा मराठा समाजाला नव्हे तर सुरु असलेल्या झुंडशाहीला विरोध आहे. आरक्षण देणे म्हणजे 'गरीबी हटाव'चा कार्यक्रम नाही. दलित समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे नोक-या मिळाल्या. परंतू गरीबी हटली नाही. जो वर्ग खरोखरच उपेक्षित राहिला आहे, त्याला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या उपेक्षितांना आरक्षण द्यावे. त्यांना जे दिले तेच ओबीसी समाजाला द्यावे. गेल्या दोन महिन्यात दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष,निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे जे काम करत आहेत,ते थांबवा. जनगणना करा. ओबीसींचा अनुशेष भरुन काढा अश्या आमच्या मागण्या आहेत, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील रात्री अपरात्री सभा घेतात. आपण पंधरा दिवसात एखादी सभा घेतो. मात्र राज्यात अशांतता निर्माण करण्याचा आरोप केला जातो. जरांगे पाटील यांच्या सभांना परवानगी कोण देतो. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कुणबी दाखला एका दिवसात मिळतो. इतरांना दाखले मिळण्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी का लागतो असे सवाल भुजबळ यांनी उपस्थित केले. जरांगे यांनी आक्षेपार्ह बोलणे थांबवावे. सर्वांच्या संयमाला मर्यादा असतात.जर तो संपला तर त्याला कोणी ही आवरु शकत नाही. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल असा इशारा देत,  महाराष्ट्रातील प्रशासन देशात अव्वल मानले असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस यंत्रणेतील घटकांनी अशा बाबींकडे त्रयस्थपणे पहावे. वेळेत उपाय करावा अन्यथा काबूत येणार नाही अशी अशांतता माजेल असा इशारा भुजबळ यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, दौलतराव शितोळे, कल्याणराव दळे, राजाराम पाटील, शब्बीर अन्सारी, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मण हाके, पांडुरंग शिंदे, तानाजी धोत्रे यांची भाषणे झाली. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरIndapurइंदापूरmarathaमराठा