शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

मुलांमागे सारखी कुरकुर नको , त्यांना मोकळीक द्या : शोभा भागवत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:23 PM

मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 'खेळां'सारखं दुसरं कोणतेही उत्तम माध्यम नाही..

ठळक मुद्देगरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांच्याशी ' लोकमत' ने संवाद साधला

कोरोना संचारबंदीच्या काळात होम क्वारंटाईन पालकांना मुलांबरोबर कसा वेळ घालवायचा? या चिंतेने ग्रासले आहे. ना उन्हाळी शिबिरे ना पार्कची सफर ना ट्रिपची मजा, मग मुलांना कुठं आणि कसं गुंतवून ठेवायचं? असा गहन प्रश्न पालकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 'खेळां'सारखं दुसरं कोणतेही उत्तम माध्यम नाही असं वारंवार सांगणाऱ्या आणि सर्व वयोगटातील मुलांसाठी विविध शिबिरे व कौशल्यापूर्ण उपक्रमांची विविध दालने खुली करणाऱ्या गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांच्याशी  ' लोकमत' ने संवाद साधला.  मुलांबरोबर वेळ घालविण्याची चांगली संधी मिळाली आहे. अशा सकारात्मक विचारातून मुलांना शांत आणि आनंदी ठेवा असा बहुमोल सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे.----------------------------------------------------------------------------------------------नम्रता फडणीस* या काळात पालकांनी मुलांशी कशाप्रकारे नातं निर्माण करायला हवं?- आजकाल बरेच पालक नोकरी करीत असल्यामुळे त्यांना मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवायला वेळ मिळत नाही. ही पालकांना सुवर्णसंधी मिळाली आहे असं मानून त्यांनी मुलांना अधिकाधिक वेळ द्यायला हवा. त्यांच्यासमवेत घरबसल्या अनेक खेळ खेळू शकतात. त्यांच्या बौद्धिकतेला चालना देणारे अनेक उपक्रम राबवू शकतात. त्यातून पालक-मुलांमध्ये एक चांगल नात तयार होईल आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल. या काळात पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे.* मग असे कोणते खेळ आहेत ते पालक-मुलांना एकत्रितपणे खेळता येऊ शकतात?- पालकांना वेगळं काही करण्याची गरज नसते. मुलं त्यांचे खेळ स्वत:च शोधून काढतात. फक्त मुलांना तेवढी मोकळीक दिली पाहिजे. सारखं हे करू नको ते करू नको असं म्हणता कामा नये. त्यांना जे हवं ते करू द्यावं. त्यांच्याशी कँरम, बॉल, बँडमिंटन खेळा. पालक आपल्या लहानपणीचे खेळ देखील त्यांच्याबरोबर खेळू शकतात. लहानपणी त्यांनी केलेला वेडेपणा मुलांना सांगावा.  त्यांच्याशी गप्पा मारा.व्यात मुलांना असं वाटलं पाहिजे कीआई-बाबांना आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते आपल्याशी संवाद साधत आहेत. मला वेळ नाही असं ते म्हणत नाहीत.हा  विश्वास त्यांना आपोआपच वाटायला लागेल.* पालकांनी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात असं वाटतं?-मुलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना धमक्या देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना शिक्षा देऊ नका. चला वेळ मिळाला आहे तर मुलांवर तोंडसुख घ्या असं करू नका. इतर मुलांबरोबर त्यांची तुलना करू नका. परस्पर मुलांशी निगडित गोष्टी ठरवून टाका. मुलांना रागावू आणि बोलू नका. त्यांचं विनाकारण सांत्वन देखील करू नका. मुलांना माझं तुज्यावर खूप प्रेम आहे, तुज्यावर विश्वास आहे, तुझं यावर मत काय आहे?  आवर्जून विचारा. आज हे असं करूया का? मला मदत करशील का? असं त्यांना महत्व देऊन त्यांच्याशी बोला आणि विश्वास संपादन करा.  मुलांशी बोलताना आपली भाषा सुधारा. जर चुकले असाल तर मुलांनाही सॉरी म्हणा.* या काळात मुलांना समजून घेतले नाही तर त्यांना देखील नैराश्य येऊ शकतं  का?- नाही, मुलांना असं सहज कधी नैराश्य येत नाही आणि आलं तरी ते लवकर बाहेर पडतात. पालकांना मुलांबरोबर वेळ घालवणं माहितीच नाहीये. ते आपापली काम करीत असतात आणि मुलं एकटेच काहीतरी करत बसतात. यातून मुलांना एकटेपणा जाणवू शकतो किंवा त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढू शकतो. त्यांच्याबरोबर पालकांनी कायम राहावे. त्यांना सत्तत शांत आणि आनंदी ठेवले पाहिजे.* सध्याची मुलं ही मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काय करायला हवं?- मुलांचा  ह्यस्क्रीन टाइमह्ण निश्चित केला पाहिजे. यामुळे डोळे कसे खराब होतात. हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे.  तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवा म्हणजे त्यांना मोबाईलचाच विसर पडेल.---------------------------------

टॅग्स :PuneपुणेinterviewमुलाखतStudentविद्यार्थीrelationshipरिलेशनशिपCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस