शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा १९ मार्चला मुंबईत आंदोलन, तुपकरांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:47 IST

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले, तरी त्यांना गुडघे टेकायला लावू

पुणे: क्रांतिकारी शेतकरी संघटनेची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. ३) पुण्यात पार पडली. यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला इशारा देत दि. १८ मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा, अन्यथा दि. १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू, असा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले, तरी त्यांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरातून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ, तसेच तरुण शेकडो शिलेदार बैठकीसाठी पुण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेची रूपरेषा, भूमिका आणि आगामी काळातील उद्देशाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभारावर तुफान हल्ला चढवला. उत्पादन खर्चाएवढाही भाव नसल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात येऊन ठेपला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, गजानन अहमदाबादकर, राजकुमार कसबे, राजाभाऊ देशमुख, अंबादास कोरडे, लक्ष्मण मोरे, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, चंद्रशेखर गवळी, भगवान शिंदे, सत्तार पटेल, ज्ञानेश्वर टाले, नारायण लोखंडे यांच्यासह राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘किसान आर्मी’ची घोषणा

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जशी इंग्रजांच्या काळात पत्री सरकारची स्थापना केली होती, त्याच धर्तीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ‘किसान आर्मी’ तयार करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. ही किसान आर्मी ठोका-ठोकीचे काम करणार आहे. शेतकऱ्यांची सक्तीची वसुली करणारे बँक अधिकारी, शेतकऱ्यांची वीज तोडणारे, शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना, तसेच गुंड, मुजोर नेते यांना झाेडपून काढण्यासाठी किसान आर्मीची टीम गावागावात काम करेल, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRavikant Tupkarरविकांत तुपकरFarmerशेतकरीagitationआंदोलनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसा