शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:23 IST

अण्णांच्या अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलं, स्वतःच्या नातवाला मारताना त्यांना दया आली नाही का?

पुणे: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये गोविंदा उर्फ आयुष कोमकर या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खरंतर हे सगळं प्रकरण पूर्व वैमनस्यातून झाल्याचं आणि बदलीच्या भावनेतून झाल्याचे आरोप होत आहेत. या सगळ्या प्रकरणावर आयुषची आई कल्याणी यांनी बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बरोबर एक वर्षांनी गणेश कोमकरचा मुलगा आयुष्य याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आंदेकर कुटुंबीयांनी हा कट रचल्याचा आरोप होऊ लागला आहे. गणेश कोमकरच्या पत्नीनेही बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर आरोप करत सगळं काही सांगितलं आहे. 

कल्याणी म्हणाल्या, बंडूअण्णा आता म्हणताहेत की आयुष्य हा माझा नातू आहे. मी असं करणार नाही. मी ठामपणे सांगू शकते की, त्यांचा प्लॅनच असतो की आम्ही बाहेर जातो. तुम्ही हे करा म्हणजे आमच्यावर नाव येणार नाही. मी त्यांना चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे मी म्हणते आता त्यांना आत ठेवले तर बाहेर येऊनच देऊ नका. त्यांना फाशीची शिक्षा नाहीतर जन्मठेप असं काहीतरी होऊद्या अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलताना त्यांनी केली आहे. पुण्यातला दहशतवाद थांबवण्यासाठी त्यांना सोडूच नये. पोलिसांनी आणि अजित दादा, देवेंद्र फडणवीसांनी जातीने आमच्याकडं लक्ष द्यावं. आमचा मुलगा कशातच नव्हता. त्याला फक्त न्याय मिळवून द्यावा. तो इतका साधा होता. त्यांनी आम्हाला सांभाळलं. आमच्याकडं लक्ष दिलं म्हणजे तो इतका समजूतदार होता की यात कशातच तो नव्हता. माझी हीच विनंती मी त्याच्यासाठी जास्त काहीच करू शकले नाही. मला फक्त आता त्याच्यासाठी न्याय पाहिजे. 

बंडूअण्णा हे माझा नातू असल्याची भावनिक साथ ते खरंतर कोर्टामध्ये घालताना दिसतायेत. आम्ही महाराष्ट्रात नव्हतो केरळला होतो असेही ते कोर्टात म्हणाले. याबाबत बोलताना कल्याणी म्हणाल्या,  त्यांना काळीज कसं नाही. त्यांच्याच अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलंय. त्याचा जन्म झाल्यावर बंडूअण्णा आणि गणेश कोमकर ते सगळे बालाजीला गेले होते. अण्णांनीच त्याचं नाव ठेवले मग एवढं त्या मुलाविषयी तरी तुम्हाला दया नाही आली.  काहीच वाटलं नाही. बदला घ्यायचा होताना आणि कसला बदला आम्ही काय केलंच नाहीये. गणेशने त्याच्या मृतदेहावर हात ठेवून शपथ घेतली की, मी काहीच केलं नाही तरी मी ही शिक्षा भोगतोय. हे सगळे राजकीय दबाव टाकतायेत. त्यांचा सगळा पैशावर खेळ आहे. पण आज निष्पाप मुलाचा जीव गेला. आणि आता अजूनही कृष्णा, शिवम, अभिषेक, लक्ष्मी, आंदेकर हे सगळे फरार आहेत. तर अजून आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या घरात मुलं आहेत. त्यांचा पण जीव धोक्यात आहे. ते आज घराबाहेर जाऊ शकत नाहीत. वनराज आंदेकरांचा खून आम्ही केला नसताना आम्ही एवढं भोगलं. तेव्हा सगळे आमच्या विरोधातच बोलत होते की. आम्हीच केलं बहिणींनी सुपारी दिली कोणी बाईला आम्ही सुपारी दिली का? आम्ही कोणाशी बोलताना पाहिलं काहीच नाही आणि दाजींनीच खून केला मेव्हण्याचा असे पण म्हणत होते.  

आमच्याच लोकांनी आमचा घात केलाय हे मी ठामपणे सांगू शकते. कारण का ती मुलं त्यांचीच आहेत. आणि आता फरार अण्णा जेव्हा सापडले तेव्हाच ती दोन मुलं पण सापडली. मग ती मुलं त्यांच्याबरोबर सापडलीच कशी? असं मी म्हणते. बरं. पण आता या प्रकरणामध्ये बरेच जणांना अटक पण झालेली आहे. त्यांना पोलीस कोठडी पण सुनावलेली आहे. या सगळ्या प्रकरणात अजूनही FIR किंवा गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. पोलीस आम्हालाही फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला येऊन देत नाहीत. पोलिसांनी अजूनपर्यंत आमची नीट बाजू व्यवस्थित ऐकून घेतलेली नाहीये. ही लोकं अशी किती मोक्याचे केसेस असले की आत जातात आणि लगेच बाहेर येतात. सहा महिन्यांनी दीड वर्षांनी तर असं होता कामा नये. आता हे आत गेले तर आताच नाही का यांना जन्मठेप नाहीतर फाशी दिली पाहिजेल अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसDeathमृत्यूCourtन्यायालयPoliticsराजकारण