शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

चाकणकर पिताहेत गढूळ पाणी!

By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकणकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत

चाकण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकणकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कुजलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीबरोबरच गढूळ पाणीही येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मुळातच चाकण परिसरात कमी दाबाने होणारा पिण्याचा पुरवठाही ही समस्या आहेच. त्यात गढूळ पाणीपुरवठा होऊ लागल्याने येथील नागरिक पुरते वैतागले आहेत. गेल्या तीन -चार दिवसांपासून हा पाणीपुरवठा होत आहे. चाकणला पाणीपुरवठा होणाऱ्या वाकी केटी बंधाऱ्यांच्या परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने चिखल मिश्रित गाळाचे प्रमाण अधिक होते. परिणामी जलवाहिनीद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण यंत्रणेचा विषय चव्हाट्यावर आला आहे. हे पाणी प्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाईलाजाने पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते. यापुढे गढूळ पाणीपुरवठा होऊ नये याची काळजी घेतली जावी, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. पाण्याचे शुद्धीकरण म्हणजे केवळ ब्लिचिंग पावडर जलकुंभांत टाकणे एवढेच काम होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. (वार्ताहर)