शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Swachh Bharat Mission: कचरामुक्त पुणे जिल्हा कागदावरच! पैसे, मंजुऱ्या असूनही काम पूर्ण होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 19:52 IST

कचऱ्याची गावातच विल्हेवाट लावण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा प्रकल्प उभारण्यात येणार होते

निनाद देशमुख

पुणे : कचऱ्याची गावातच विल्हेवाट लावण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा प्रकल्प उभारण्यात येणार होते. या प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार झाले, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यताही मिळाल्या. एवढेच नव्हे तर १५ व्या वित्त आयोगातून पैसेही मिळाले, असे असतानाही २ ऑक्टोबर उलटूनही जिल्ह्यात केवळ ३५५ घनकचरा प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. उर्वरित गावांमध्ये काही ठिकाणी प्रशासकीय, तर काही ठिकाणी ग्रामपंचायतींच्या उदासीन धोरणांमुळे ही कामे सुरू होऊ शकली नाही.

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी प्रत्येक गावात घनकचरा प्रकल्प उभरण्यात येणार होते. या मोहिमेची वाजत-गाजत सुरुवात करण्यात आली. ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे प्रकल्प, तर छोट्या गावात छोटे प्रकल्प उभारण्यात येणार होते. ७ जून रोजी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात करण्यात आली. २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हा कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले होते. यासाठी प्रत्येक गावात जाऊन प्रकल्प उभारण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करण्यात आले. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे १२०७ गावांचे घनकचरा प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. यातील ११०० प्रकल्पांना तांत्रिक मान्यताही देण्यात आली. तर, ७५० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, केवळ ३५५ प्रकल्पांचेच काम होऊ शकले. विशेष म्हणजे, या प्रकल्पाला जागा मिळण्यासाठी जागांची अडचण सोडविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. मात्र, असे असतानाही, तसेच गायरान जागा उपलब्ध असतानाही जागा नसल्याचे कारणे देत अनेक प्रकल्पांची कामेही रखडलेली आहे.

जिल्हा परिषदेतर्फे गावांकडे वारंवार यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. स्वच्छता विभागाचे अधिकारी टोणपे सर यांनी ग्रामपंचायतींचे दौरे केले. मात्र, त्यांना ग्रामपंचायत स्तरावरून, तर कधी प्रशासकीय स्तरावरूनच अडचणी आल्या. २ ऑक्टोबर २०२१ रोजी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्प रखडल्यामुळे कचरामुक्त गावे ही कागदावरच राहिली आहे.

घनकचरा प्रकल्पात गावांची, प्रशासनाची उदासीनता 

६ जून २०२१ ला स्वराज्य दिनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कचरामुक्त पुणे जिल्ह्याचे आवाहन केले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी पाठपुरवा केला. मात्र, असे असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, तसेच गावपातळीवरही कचरा प्रकल्पाबाबत उदासीन भूमिका असल्याने कचरामुक्त पुणे जिल्हा हा कागदावरच राहिला आहे.

''घनकचरा प्रकल्पासंदर्भात जिल्हा परिषदेतर्फे सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून तांत्रिक, तसेच प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासोबतच निधी सुद्धा दिला आहे. जागांचे प्रस्तावही देण्यात आले आहे. मात्र, अनेक गावांत मोजणीची प्रक्रियापूर्ण होऊ शकली नाही. यामुळे अद्यापही घनकचरा प्रकल्प हे पूर्ण होऊ शकले नाही असे आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी सांगितले.'' 

 ''ग्रामपंचायत स्तरावर आमचा पाठपुरावा सुरू आहे. अनेकदा आम्हाला जागा नसल्याची कारणे सांगितली जातात. प्रकल्पासाठी गायरान जागांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा हे प्रकल्प रखडले आहे. या संदर्भात आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे म्हणाले आहेत.''  

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPuneपुणेSocialसामाजिकAjit Pawarअजित पवारGovernmentसरकार