शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सोपानमहाराज नामदास अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:42 IST

सासवड दिवे घाटात अपघाती निधन 

आळंदी : संत नामदेवरायांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे सासवड दिवे घाटात अपघाती निधन मंगळवारी (दि.१९) झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली. अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, महंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोपानमहाराज नामदास यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिवावर इंद्रायणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आळंदीवर शोककळा पसरली. राज्यातून आलेले भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तत्पूर्वी सोपानमहाराज नामदास यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विष्णू मंदिर येथे ठेवण्यात आले होते. अंत्यविधी पूर्वी मंदिर व ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. यावेळी नागरिक, भाविकांनी दर्शनास गर्दी केली. त्यांचे पार्थिवावर येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकुल वातावरणात भाविक, वारकरी यांचे उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आमदार संजय जगताप, माजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी आमदार प्रकाश देवळे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, वारकरी फडकरी संघटनेचे माऊली महाराज जळगावकर, धोंडोपंतबाबा शिरवळकर, बाळासाहेब महाराज उखळीकर, राणू महाराज वासकर, नीलेश महाराज लोंढे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, बाळासाहेब महाराज शेवाळे, नरहरी महाराज चौधरी, रामभाऊ महाराज राऊत, संजयमहाराज घुंडरे, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मारुती महाराज कुरेकर, तात्या महाराज कराडकर, मारुती महाराज कोकाटे, आळंदीतील वारकरी, भाविक, नामदेवरायांचे दिंडीतील मान्यवर, नामदास परिवार, शिष्य, गायक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदेवरायांचे वंशज नामदास परिवार असून या परिवाराकडून आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी प्रसंगी कीर्तन सेवेची परंपरा आहे. सेवेसाठी तसेच आळंदी यात्रेला येण्यासाठी दिंडीचा प्रवास सुरू होता. नामदेवरायांची दिंडी आळंदीला येत असताना दिंडीला अपघात झाला. सोपानमहाराज नामदास (वय ३६) हे  वै. तुळशीदास महाराज नामदास यांचे चिरंजीव आहेत. ते संत नामदासमहाराज यांचे १७ वे वंशज असून ते बालपणापासून आळंदी वारीला येत आहेत. ते कीर्तन सेवेत नेहमी टाळाची सेवा देत असत. ते विवाहित असून केशव महाराज नामदास यांचे ते पुतणे होत. 

टॅग्स :AlandiआळंदीAccidentअपघातDeathमृत्यू