शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा : पुनर्वसनाचा तिढा सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 13:41 IST

गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरु असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अखेर सुटला आहे.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांना हेक्टरी १५ लाख देणार; दोन्ही महापालिकेकडून २३४ कोटीऑक्टोबरपर्यंत पुण्याला भामा आसखेडचे पाणीधरणातून पुणे शहराच्या पूर्वभागाला नगररोड, चंदनगनर, खराडी, वडगाव शेरी भागाला पाणी पुरवठा

- सुषमा नेहरकर-शिंदे -पुणे : गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरु असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अखेर सुटला आहे. न्यायालयात गेलेल्या ३८८ खातेदारांना अन्य ९७८ प्रत्येकी हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून, यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने २३४ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. यापैकी ११० कोटी जिल्हा पुनर्वसन अधिका-यांच्या बँक खात्यात जमा केले असून, लवकरच प्रकल्पग्रस्तांना पैशांचे वाटप सुरु होणार आहे.यामुळे पुण्याला भामा- आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.     खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणासाठी २००० मध्ये १ हजार ७०  हेक्टर जमिन संपादित करण्यात आली होती. या धरणामुळे परिसरातील तब्बल १ हजार ६७३ शेतकरी कुटुंबे बाधित झाले आहेत. यापैकी २०१ शेतकºयांनी शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी यासाठी ६५ टक्के रक्कम भरली होती. त्यानुसार या २०१ खातेदारांना जमीन व पैशांच्या स्वरुपात मोबदला देण्यात आला आहे. परंतु जलसंपदा विभाग आणि पुनर्वसन विभाग यांच्यातील गोंधळामुळे आपल्याला १६/२ च्या नोटीसच देण्यात न आल्याने ३८८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत भामा- आसखेड प्रकल्पग्रस्तांना त्वरित ६५ टक्के रक्कम भरून घेण्यासाठी १६/२ च्या नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गेल्या अडीच-तीन वर्षांत सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु होता. अखेर याबाबत तोडगा निघाला असून, प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या सहमतीनुसार प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.भामा आसखेडच्या १३६६ प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्यासाठी १ हजार २९० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे.परंतु भामा आसखेडचे लाभ क्षेत्र रद्द केल्याने ऐवढ्या मोठ्या प्रमाणात जमिन शिल्लक नाही. यामुळेच प्रशासनाने जमिनीच्या बदल्यात शेतक-यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिल्लक सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी २३४ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी देण्यास दोन्ही महापालिकांनी मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना तिढा सुटला आहे.  ------------  प्रकल्पग्रस्तांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणारगेल्या अनेक वर्षांपासून भामा आसखडे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. यामुळे शेकडो शेतकरी आपल्या हक्कासाठी न्यायालयात गेले होते. त्यामुळे अधिका-यांच्या बहुतेक वेळ न्यायालयात चकरा मारण्यात जात होता. याबाबत सर्व माहिती एकत्र करून पुनर्वसन शिल्लक असलेले शेतकरी, न्यायालयातील प्रकरणे, पुनर्वसनासाठी आवश्यक जमिन अथवा निधी याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात  आला. त्यानंतर संबंधित प्रकल्पग्रस्त, लोकप्रतिनिधी व अधिकारी याची बैठक घेऊन वस्तूस्थिती समोर मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात ११० कोटी आमच्याकडे जमा केले आहेत. आता लवकरच वाटप सुरु करण्यात येणार असून, प्रकल्पग्रस्तांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.-भरत वाघमारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी---------------एंजटांचे दुकान बंदभामा आसखडे धरणाताली प्रकल्पग्रस्तांना खेड तालुक्यात चाकण परिसरामध्ये जमिनी मिळणार असल्याची चर्चा होती. यामुळे प्रशासनाच्या अगोदरच एंजटांनी प्रकल्पग्रस्त शेतक-यांना गाढून त्यांची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच टोकन म्हणून एक दोन लाख रुपये देखील शेतक-यांना या एंजटांकडून देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार सुमारे २०० शेतकरी या एंजटांच्या जाळ््यात अटकले आहेत. यामुळेच आता जिल्हा प्रशासनाने थेट प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे अनेक एंजटांचे दुकान बंद झाली आहेत.------------- ऑक्टोबरपर्यंत पुण्याला भामा आसखेडचे पाणी  भामा आसखेड धरणातून पुणे शहराच्या पूर्वभागाला नगररोड, चंदनगनर, खराडी, वडगाव शेरी या भागाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने तब्बल ३८० कोटी रुपयांची पाणी योजना हाती घेतली आहे. यासाठी आता पर्यंत तब्बल १७२ कोटी रुपये खर्च करून ७५ टक्के काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. परंतु शेतक-यांच्या सततच्या आंदोलनामुळे काम बंद आहे. आता पुनर्वसाना तिढा सुटला असल्याने ऑक्टोबर २०१९ अखेर पर्यंत शहराला पाणी पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी