शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण जोरात जनता संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:15 IST

प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे...

पिंपरी : तळेगावमध्ये नियोजित असलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे गुजरातला स्थलांतर झाले. त्यामुळे राज्यातील तब्बल दीड लाख तरुणांचा रोजगार बुडाला आहे. यावरून आता सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत. प्रकल्प नेमका कोणामुळे राज्याबाहेर गेला हे सांगण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मैदानात उतरले आहेत. प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

तळेगावमध्ये सेमीकंडक्टर बनवण्याचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यानंतर याला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे सांगत विरोधक असलेल्या महाविकास आघाडीने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यावरून ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच शनिवारी (दि. २४) आदित्य ठाकरे यांनी वडगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील जनतेला गाजर नको तर रोजगार हवा आहे. त्यामुळे या खोके सरकारविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश मोर्चा आणखी तीव्र करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.

शनिवारी झालेल्या या जनआक्रोश मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपदेखील मैदानात उतरली आहे. भाजपच्या वतीने सोमवारी (दि. २६) वडगाव नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन झाले. यामध्ये खासदार श्रीरंग बारणे, आमदार राम कदम यांनी सहभागी होत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे राज्यातील जनतेशी खोटे बोलत असून प्रकल्प त्यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच बाहेर गेला असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच प्रकल्प राज्यात येण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असताना ‘मविआ’मधील नेते त्यांच्याकडे पैसे मागत असल्याचा आरोपही केला. आगामी काळात प्रकल्प नेमका कोणामुळे बाहेर गेला हे सांगण्यासाठी राज्यातील गावा-गावामध्ये जाणार असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले. त्यामुळे राज्यामध्ये भविष्यात एका बाजूला आदित्य ठाकरे यांचे जनआक्रोश आंदोलन असणार आहे. तर दुसरीकडे भाजपाचे ठिय्या आंदोलन असणार आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कोणामुळे गेला हे सांगण्यासाठी सत्ताधारी विरोधक दोघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे. मात्र, सत्ताधारी विरोधकांच्या या आंदोलनामुळे जनता संभ्रमात सापडली आहे.

भाजपाचे दावे

आदित्य ठाकरे यांनी मावळात येत जनतेची दिशाभूल केली. तळेगाव निगडे टप्पा क्रमांक ४ मध्ये एमआयडीसीसाठी ६ हजार ६०० एकर जमीन होती. त्यामधील गावासाठी व शेतीसाठी जमीन सोडून ५ हजार ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार होते. २०१८ सालामध्ये शासनाच्या वतीने ७३ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या संमतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. मात्र, ही प्रक्रिया लांबवण्यात आली. तसेच भूसंपादन करण्यात येणाऱ्या काही भागामध्ये इको सेन्सिटिव्ह भाग होता. त्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी परवानगीसाठी तो केंद्र सरकारकडे पाठवणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने कंपनीने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा भाजप करत आहे.

महाविकास आघाडीचे दावे

महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये जात असल्याने कुंचबणा होत आहे. वेदांता व बल्क ड्रग पार्कसारखे महत्त्वाचे दोन प्रकल्प सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे राज्याबाहेर जात आहेत. वेदांता प्रकल्प तळेगावमध्ये येणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सभागृहामध्ये जाहीर केले होते. त्यानंतर एक महिन्यामध्ये असे काय झाले की दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा वेदांता प्रकल्प बाहेर गेला, असा सवाल महाविकास आघाडी करत आहे.

टॅग्स :PuneपुणेFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेRam Kadamराम कदम