शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 7:55 PM

धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.....

पुणे : रब्बी हंगामासाठी जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच टीएमसी पाणी यासाठी देण्यात येणार आहे. मात्र, धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

रब्बी हंगामासाठी दौंड, इंदापूर, हवेली या भागातून पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे आली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आल्याचे खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून कालव्यातून सुमारे ७०० क्युसेकने पाणी ग्रामीण भागात दिले जाणार आहे. येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे साडेपाच टीएमसी पाणी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या खडकवासला प्रकल्पांमधील चारही धरणांत २५.६ टीएमसी अर्थात ८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून साडेपाच टीएमसी पाणी सोडल्यानंतर सुमारे २० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. ग्रामीण भागातही पुरेसा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. तसेच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, हे पाणी सोडताना पुणे शहराच्या पिण्याच्या प्रश्न निर्माण होणार नाही, याकडेही महापालिकेने लक्ष वेधले होते. यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने ग्रामीण भागाला केवळ रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडावे, उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची परिस्थिती नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चारही धरणातील पाणी साठ्याचे व्यवस्थापन यंदा महत्त्वाचे ठरणार असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चारही धरणांमध्ये मिळून सध्या १.५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी याच वेळी चार धरणांमध्ये २७.२२ टीएमसी (९३ टक्के) जलसाठा होता. पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे. पिकांसाठी पाणी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळा येणार नाही, परंतु महापालिका प्रशासनाला पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पाणी व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.

टीएमसीमध्ये पाणीसाठा

टेमघर २.११ (५६ टक्के) वरसगाव ११.७ (९१ टक्के) पानशेत १०.२ (९५ टक्के) खडकवासला १.५ (७५ टक्के) भामा आसखेड ६.६७ (८७ टक्के) एकूण २५.६ टीएमसी (८७ टक्के) गेल्या वर्षीचा साठा २७.२ टीएमसी (९३ टक्के)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkhadakwasala-acखडकवासला