शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

मोडेप्रो कंपनीत आग : कुरकुंभची औद्योगिक सुरक्षा अधांतरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:21 IST

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही ...

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही धोक्यातच असल्याचे वास्तव चित्र वारंवार घडणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनेतून अधोरेखित होत आहे.प्रकल्प उभा करताना दिल्या जात असणाºया विविध परवानग्या या आर्थिक संबंधांतून निकष न तपासताच दिल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून, त्याबाबत इतक्या वर्षांपासून एकाही शासकीय अधिकाºयाने आपली भूमिका स्पष्ट मांडलेली दिसत नाही. एरवी एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे अधिकारी अपघाताच्या वेळेस कुठे गायब असतात, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.शुक्रवारी (दि. २८) सकाळी कुरकुंभ येथील मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग जरी थोड्या प्रमाणात असली, तरी कंपनीकडे असणारी सुरक्षा यंत्रणामात्र त्या आगीला नियंत्रित करणारीदेखील नसल्याचे दिसत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही; मात्र याघटनेतून असुरक्षितता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मालकांकडे कंपनी उभी करण्यासाठी करोडो रुपये असतात. अनेकविध परवानग्या मिळविण्यासाठी खर्चदेखील भरमसाट केला जातो; मात्र सुरक्षेच्या बाबतीत उदासीनता का असते, हा प्रश्न येथील सर्वसामान्य कामगारांना नेहमीच पडत आहे.दरम्यान, या औद्योगिक क्षेत्रात होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून अनेक बैठकादेखील झाल्या आहेत. यामध्ये औद्योगिक क्षेत्राशी निगडितशासनाच्या विविध अधिकाºयांनी हजेरीदेखील लावलेली आहे. सुरक्षेच्या बाबतीत अनेकांना निर्देशदेखील देण्यात आले आहेत. मात्र, बैठका संपल्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असून दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवून कंपनी मालक व व्यवस्थापन वेळकाढूपणा करीत आहे.त्यामुळे अधिकारी व व्यवस्थापन यांच्यामधील संबंध लपलेले नाहीत; परंतु या सर्वांच्या मध्ये येथील ग्रामस्थ व कामगार नेहमीच दुर्लक्षित होत आहे. रासायनिक प्रकल्प असूनदेखील अनेक कंपन्यांकडे स्वत:चे सुरक्षा अधिकारी नाहीत. परिणामी, प्रत्यक्षात काम करणाºया कामगारांना सुरक्षेबाबत काहीच माहिती नसते. थोड्याफार प्रमाणात असणाºया सुरक्षा उपकरणांना हाताळण्याची माहितीदेखील बºयाच अंशी कोणाला नसते. त्यामुळे घटना छोटी जरी असली, तरी कामगार भयभीत होतात. मात्र, याबाबत पुढाकाराने कोणीच लक्ष देत नाही.औद्योगिक क्षेत्रासाठी नेमलेले शासकीय सुरक्षा अधिकारी नाममात्र अपघातानंतर येऊन जागेची पाहणी करून जातात. यापलीकडे दुसरे काहीच होत नसल्याचे आजवरच्या घटनांतून समोर येते.बहुतांशी कंपन्यांकडे जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकादेखील नसते. त्यामुळे सर्व कारभार रामभरोसे असल्याचे निदर्शनास येते. मात्र, या छोट्या घटनेतूनच धडा घेऊन भविष्यातील मोठ्या दुर्घटना टाळणे सर्वांसाठी भल्याचे होईल, याची जाणीव वेळीच जबाबदार यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे; अन्यथा मोठा अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Puneपुणे