शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 19:31 IST

पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे.

पुणे : मुलीचं लग्न म्हंटलं की माेठ्या थाटामाटात करण्याकडे अनेकांचा कल असताे. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यापासून ते चायनीज पासून ते साऊथ इंडियन डिशेसची मेजवाणी ठेवली जाते. परंतु पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नातदुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. जाेशी यांनी लग्नातील अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या पाऊलाचे सर्वच स्तरातून आता काैतुक हाेत आहे. 

    यंदा मराठवाडा भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाड्यातील लाखाे विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. दुष्काळामुळे पिकं करपल्याने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांना मुलांना पुण्यात पैसे पाठवणे अशक्य झाले आहे. परिणामी हजाराे विद्यार्थ्यांना अर्धपाेटी राहूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता कुलदीप आंबेकर पुढे आला. कुलदीपने हेल्पिंग हॅण्ड ही संस्था सुरु करुन दुष्काळीभागातील विद्यार्थ्यांच्या मेसचा आणि इतर खर्च भागविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून मदत गाेळा करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता अनेक लाेक मदतीसाठी पुढे आले. जाेशी यांना सुद्धा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मदत करायची हाेती. अर्धपाेटी बुद्धी चालत नाही याची त्यांना जाणीव हाेती. त्यांचे मित्र सचिन ईटकर यांच्या मदतीने त्यांना हेल्पिंक हॅण्ड या संस्थेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या संस्थेच्या 10 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांनी तब्बल 1 लाख रुपयांची मदत या मुलांना केली. 

    जाेशी म्हणाले, मला मुलीच्या लग्नात एखाद्या सामाजिक उपक्रमाला मदत करायची हाेती. याबाबत मी सचिन इटकर यांच्याशी बाेललाे. त्यांनी मला हेल्पिंग हॅण्ड या संस्थेबद्दल सांगितले. त्यानंतर मी 10 मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मी या आधी शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे उपाशी पाेटी बुद्धी चालत नाही हे मी पाहिलं आहे.  समाजाचं आपण काहीतरी देणे लागताे या भावनेतून मी मदत करण्याचा निर्णय घेतला. यातून इतरांनाही आपण समाजातील गरजुंना मदत केली पाहिजे हा संदेश मिळणार आहे. तसेच माेठा खर्च करुन लग्न करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना मदत केली तर तुम्ही वाजवलेल्या लाखभर रुपयातून त्या मुलांच्या सहा महिन्याच्या मेसचा खर्च वाचविता येताे हा विचारही लाेक यापुढे करतील अशी आशा आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळStudentविद्यार्थीmarriageलग्न