शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्याबाबतचे सूत्र प्रसिद्ध करण्यात ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्याबाबतचे सूत्र प्रसिद्ध करण्यात आले. राज्य मंडळाने सर्व शाळांना त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर राज्य मंडळाने दिलेल्या संगणकीय प्रणालीत ऑनलाइन गुण भरण्याचे काम शाळांकडून सुरू आहे.

राज्य मंडळ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना यांनी इयत्ता दहावीचा लवकर तयार व्हावा, यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. शाळांना विद्यार्थ्यांचे गुण भरण्यास येत्या ९ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण काही विद्यार्थ्यांच्या निकालाला अद्याप शाळांनी हातच लावला नाही.

राज्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रक्रिया अद्याप सुरूच झालेले नाही. त्यात सर्वाधिक १ हजार ३६८ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र, राज्य मंडळाकडून या अडचणी सोडवल्या जात आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा निकालसुद्धा लवकर तयार होईल, अशी आशा व्यक्त केले जात आहे.

--------

कोल्हापूर व कोकण विभागातील शाळांनी इयत्ता दहावीच्या निकालासाठी राज्य मंडळाच्या संगणक प्रणालीत गुण भरण्यामध्ये आघाडी घेतली असून लातूर, नागपूर, अमरावती विभागातील शाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागातील शाळा येत्या नऊ जुलैपर्यंत गुण भरण्याचे काम पूर्ण करतील, अशी अपेक्षा निकाल तयार करणा-या समन्वय समितीतील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

-----

* राज्यातील इयत्ता दहावीची परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी : १६,४,४४१

* किती विद्यार्थ्यांचे गुण संगणक प्रणालीत भरून कन्फर्म केले : १५,९२,४१८

* किती विद्यार्थ्यांचे गुण अद्याप कन्फर्म केले नाही: ८,९७१

* किती विद्यार्थ्यांच्या निकालाला अद्याप हातही लावला नाही : ३,०५२

-------