शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातल्या उद्योगासाठी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:57 IST

जिल्ह्यामध्ये शेकडो एकर जमिनी अनेकांनी औद्योगिक वापरासाठी अत्यंत कमी दरामध्ये खरेदी केल्या. मात्र,...मागील पाच ते वीस वर्षांमध्ये यातील अनेकांनी या जमिनींचा वापरच केला गेला नाही..

ठळक मुद्देजिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सुनावणी घेवून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याचा दिला आदेश औद्योगिक वापरासाठी घेतलेल्या जमिनीचा वापर इतर कारणांसाठीचाकण,रांजणगावसह अशा सर्व भागातील जमिनी मुळ मालकांना दिल्या जाणारजिल्ह्यातील सुमारे ३०० एकराहून अधिक जमीन शेतकऱ्यांना मिळणार

पुणे: औद्योगिक वापरासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या शेतजमिनींचा वापर न केल्यामुळे संबंधित जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० एकराहून अधिक जमीन शेतकऱ्यांना मिळणार आहे.अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे.राज्य शासनाने उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक कारणांसाठी शेतकरी नसलेल्यांना महसूल अधिनियम ६३/१ अ नुसार शेतजमिनी सवलतीच्या दरात अथवा नजराणा भरून विकत घेण्यास परवानगी दिली. जिल्ह्यामध्ये शेकडो एकर जमिनी अनेकांनी खरेदी केल्या.अत्यंत कमी दरामध्ये या जमिनी खरेदी केल्या. मात्र, मागील पाच ते वीस वर्षांमध्ये यातील अनेकांनी या जमिनींचा औद्योगिक कारणासाठी वापरच केला गेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली.त्यावर अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सुनावणी घेवून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याचा आदेश दिला.पुणे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुक्यात औद्योगिक कंपन्या सुरू आहेत.पुण्यात उद्योगाला पोषक वातावरण असल्याने सुरूवातीला अनेक औद्योगिक कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाकडून जमिनी घेतल्या. त्यात काही शेतक-यांनाही आपल्या जमिनी द्यावा लागल्या.परंतु,औद्योगिक वापरासाठी घेतलेल्या जमिनीचा वापर इतर कारणांसाठी केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फ्लॅबेक्स अरोमॅट्स इंडिया प्रा.लि. या कंपनीने औद्योगिक वापरासाठी देण्यात आलेल्या जमिनीच्या परवानगी आदेशाचा भंग केला आहे,अशी तक्रार मावळ तालुक्यातील आंधळे येथील शेतकरी अशोक कांबळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली होती. त्यावर सुनावणी घेवून सर्व जमिनी मुळ मालकांना परत करण्याचे आदेश मुळशी तहसीलदारांना दिले आहेत.तक्रारदार शेतकऱ्यांची तक्रार मान्य करण्यात आली असून कंपनीच्या नावे असलेली २२२ एकर जमिन आणि कंपनीच्या नावे नोंद न झालेली सुमारे ३५ गटातील जमिनी शर्तभंगामुळे मुळ मालकाला दिल्या जाणार आहेत.मुळशी तहसीलदारांनी मुळ मालकांकडून जमिन खरेदीचे प्रस्ताव घेवून सदर जमिनी मुळ मालकांना परत करण्याची कार्यवाही करावी,असेही आदेश दिले आहेत.नियमानुसार काही औद्योगिक कंपन्यांना दंडात्मक रक्कम भरून शासनाकडून प्राप्त झालेली जमिन आणखी काही वर्ष स्वत:कडे ठेवता येतात. मात्र,काही कंपन्या दंडात्मक रक्कम भरण्यास तयार नाहीत.औद्योगिक वापरासाठी घेतलेल्या मात्र उद्योग सुरू करण्यासाठी न वापरलेल्या जमिनींचा चाकण,रांजणगावसह विविध भागात शोध घेतला जात असून अशा सर्व जमिनी मुळ मालकांना दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीbusinessव्यवसाय