शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; बाजरी पिके भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:31 IST

बांगरवाडी येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही वेळातच नद्या-नाल्यांना पूर आला.

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान केले आहे.बांगरवाडी येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही वेळातच नद्या-नाल्यांना पूर आला. अनेक भागांमध्ये पावसाने नुकसान केले असून, आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळाने कैऱ्या पडल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला आहे. तसेच उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला आहे.काही ठिकाणी बीट काढणी चालू असल्यामुळे बिटाच्या शेतामध्ये पाणी साठल्याने काढणी खोळंबली आहे. कांद्याच्या शेतामध्येसुद्धा पाणी साठल्याने कांदा सडू लागला आहे. पूर्व भागातील आणे, पेमदरा, गुळूंचवाडी, नळावणे, शिंदेवाडी, तांबेवाडी आदी गावांमध्ये पाऊस झाला. या भागातील टोमॅटो, कांदा, भुईमूग ही पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच चारा पिकेही शेतात पूर्णपणे आडवी पडली असून, त्यांचेही नुकसान झाले आहे. सतत पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले असून, पिकांचा पंचनामा करण्याची मागणी संतोष आंग्रे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना