शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:51 IST

उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी गावकऱ्यांनी आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले

सासवड : पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. तेथील सात गावच्या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भू संपादन प्रक्रिया संदर्भात तीन अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना थेट गावपातळीवर संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, पुनर्वसन, परतावा, नोंदी या आणि या सारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर हे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि. ३) एखतपूर, मुंजवडी या गावांत भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत सरकारची विमानतळाविषयी भूमिका मांडली.

पुरंदर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कल्याण पांढरे यांनी शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊन, त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊन देता, फसवणूक न करता, सन्मानपूर्वक भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची भूमिका मांडली तसेच या बाबत गावपातळीवर एक समिती नेमावी, अशी विनंती केली. परंतु गावकऱ्यांनी या प्रकल्पाला आमचा विरोध कायम असल्याची भूमिका मांडली. सर्व उपस्थित बाधित शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला. सरपंच शीतल टिळेकर, महादेव टिळेकर, संतोष हगवणे, अमोल टिळेकर, बाजीराव मोरे, राजेंद्र निंबाळकर, उपसरपंच तुषार झुरंगे, दिगंबर भामे, नंदा टिळेकर, विलास मोरे, विमानतळ विरोधी समितीचे दत्ता झुरंगे यांसह अनेकांनी यावेळी आपली मते मांडून प्रकल्पाला आमचा कायम विरोध असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी गावकऱ्यांनी आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले.

दोन्ही गावांमध्ये विमानतळाविषयी प्रचंड रोष 

एमआयआयडीसीचा या प्रकल्पाबाबतचा मनमानीपणा, शेतीच्या चुकीच्या नोंदी, शेतकऱ्याला या प्रकल्पात गृहित धरून ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा निर्णय, सर्व सात गावांनी ग्रामसभेतून ठराव मंजूर करून केलेला विरोध, गुंजवणीचे पाणी शेतकऱ्याला का विमानतळासाठी, विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी विरोध करणाऱ्या समितीच्या अध्यक्षाबाबत चुकीची भूमिका मांडणे, चाकण येथील विमानतळ रद्द होण्याची कारणे शेतीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या शेतीची गुणवत्ता अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली. कल्याण पांढरे, प्रांत वर्षा लांडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी याप्रसंगी प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. बैठकीस महिलांची संख्या लक्षणीय होती. एकूणच आज तरी या दोन्ही गावांमध्ये विमानतळाविषयी प्रचंड रोष व विरोधच दिसून आला.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरagitationआंदोलनAirportविमानतळSocialसामाजिकFarmerशेतकरी