शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

शेतकरी पतीला विमा योजनेनुसार भरपाई मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 1:14 PM

वाहन अपघातात पत्नीचा झाला होता मृत्यू

ठळक मुद्देग्राहक मंचाचा विमा कंपनीला आदेश तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीला शेतकरी विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केलेल्या तक्रारदार शेतकऱ्याला मंचाने दिलासा दिला. तक्रारदाराला दोन लाख रुपये नुकसान भरपाई सात टक्के व्याज दराने द्यावी. तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.संगीता ज्ञानेश्वर वाघमारे यांचा २० सप्टेंबर २०१६ रोजी अपघात झाला. त्या बसने प्रवास करत असताना वेगाने आलेल्या कंटेनरने बसला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पती ज्ञानेश्वर प्रभाकर वाघमारे (रा. चांदोली, खेड)  यांनी तलाठ्याकडे विम्याचा दावा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. विमा कंपनीकडून विम्याचे दोन लाख रुपये १५ टक्के व्याजासह मिळावेत. नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून २५ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी मंचाकडे दाखल केलेल्या दाव्यात केली होती. मात्र, विमा कंपनीने तक्रारदारांचा तो दावा मंजूर केला नाही किंवा नामंजूर केल्याचे देखील कळवले नाही. तसेच वाघमारे यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. (भाऊसाहेब शिरोळे भवन, चौथा मजला, पी. एम. टी बिल्डिंग, डेक्कन जिमखाना शिवाजीनगर, तालुका कृषी अधिकारी ता. खेड) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तक्रारीत केली होती.तक्रारदाराने दाखल केलेल्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावरुन संगीता वाघमारे या २०१० पासून शेतकरी असल्याचे सिद्ध होते. पोलिसांनी दाखल केलेल्या जबाबानुसार संगीता अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाताच्या पुराव्यासाठी दाखल करावयाच्या कागदपत्रांमध्ये मयत किंवा अपघातग्रस्त शेतकरी यांचा सातबारा उतारा दाखल करावा, अशी प्राथमिक अट असल्याचा शासन निर्णय आहे. संगीता यांचा सातबारा उतारा तक्रारदाराने दाखल केला होता. त्यामुळे संबंधित कागदपत्रे दाखल केली नाहीत या कारणामुळे दावा नाकारणे योग्य होणार नाही, असे मंचाने निकालात नमूद केले आहे. ........नोटीस बजावूनही अधिकारी आले नाहीतयाप्रकरणात विमा कंपनीने लेखी जबाब दाखल केला. मयत व्यक्ती शेतकरी असणे ही विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रमुख अट आहे. मयत संगीता या शेतकरी नव्हत्या. विमा कंपनीने तक्रारदारांकडे अनेकदा अनेक कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी विमा कंपनीला कागदपत्रे दिली नाहीत...........मयत संगीता या शेतकरी असल्याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी कंपनीला दिला नाही. त्या विमा योजनेअंतर्गत विमा मिळण्यास पात्र ठरत नाही, असे म्हणणे कंपनीतर्फे जबाबात नमूद केले होते. तर तालुका कृषी अधिकारी नोटीस बजावूनही हजर झाले नाहीत.................

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीDeathमृत्यूCrop Insuranceपीक विमा