शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांचे डोळे आकाशाकडे

By admin | Updated: July 5, 2014 22:19 IST

राजगुरुनगर : 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भीषण असल्याचे खेड तालुक्यातील जुनी जाणती माणसे सांगत आहेत.

राजगुरुनगर : 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भीषण असल्याचे खेड तालुक्यातील जुनी जाणती माणसे सांगत आहेत. खरिपाच्या पेरण्या होण्याची चिन्हे तर  दिसत नाहीच; पण पावसाची मृग आणि आद्र्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने, माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणीही उपलब्ध होणार की नाही, ही शंका आता भेडसावू लागली आहे. तालुक्यात सध्या सहा टँकरने 6 गावे आणि 77 वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा चालू आहे. आकाशातून आषाढधारा बरसण्याऐवजी त्या शेतक:यांच्या डोळ्यांतून बरसाव्यात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात 57 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. त्यातल्या अवघ्या 12क्क् हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. आजर्पयतची ही सर्वात नीचांकी आकडेवारी आहे.  1972 मध्ये झालेल्या दुष्काळात वळवाचे पाऊस पडले होते. त्यामुळे पेरण्या झाल्या होत्या. पण, पुढे पुरेसा पाऊस न झाल्याने तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  मात्र, पेरण्याच न होण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे जाणकार सांगतात. कितीही दुष्काळ पडला तरी तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागात पाऊस होतोच. यंदा मात्र तिथेही पाऊस नाही हे कटू वास्तव आहे. पाऊस कमी-जास्त झाला तरी भातरोपेच उगवली नाही अशी परिस्थिती  पहिल्यांदाच उद्भवल्याचे शेतकरी सांगतात.
 कडधान्याच्या पेरण्यांचा हंगाम तर निघूनच गेला आहे. भाताच्या लागवडी जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून सुरू होतात. त्या यंदा झाल्याच नाहीत. भातरोपे वाया गेली असून, बाहेरचे पाणी देऊन ज्यांनी कशीबशी जी रोपे जगविली आहेत, ती खाचरात पाणीच नसल्याने लावू शकत नाही.  नवीन रोपे टाकून ती उगवण्याची वाट पाहणो आता शक्य नाही. कारण, रोपे लागवडीयोग्य होण्यास 22 दिवसांचा किमान कालावधी लागतो. तो मिळणो आता शक्य नाही. या सर्व परिस्थितीचा सार असा आहे की खेड तालुक्यात तरी आता कडधान्ये, भात ही पूर्णपणो हातातून गेली आहेत. या आठवडय़ात पाऊस झाला नाही, तर बाजरी आणि भुईमुगाची पेरही शक्य होणार नसल्याने त्या पिकांचीही हातात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
 
जनावरे जगविणो कठीण
4तालुक्यात जुलै महिन्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची गेल्या कित्येक वर्षातली ही पहिलीच वेळ आहे. हा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पाणी मिळत असले तरी, भविष्यात तेही उपलब्ध होईल की नाही अशी शंका आहे. पेरण्या तर नाहीतच, पण डोंगरावर किंवा माळावरचे गवतही यावर्षी उगवलेले नसल्याने जनावरे जगविणो कठीण होणार आहे. 
4तालुक्याची मुख्य खरीप पिके असलेली बाजरी आणि भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरात उशिरा 15 जुलैर्पयत होऊ शकतात. त्यानंतर ही पिके पेरली जाऊ शकणार नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी सांगितले.