शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:26 PM

आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी, असे मत डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे१० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित अवयवदान प्रसार अभियानाचा समारोपग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा : चाफेकर

पुणे : आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी. त्यासाठी अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.वंचित विकास, शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट व हॅन्डरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या वतीने १० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रसार अभियानाचा समारोप डॉ. चाफेकर यांच्या उपस्थित सारसबाग गणपती मंदिराच्या परिसरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अभियानाचे प्रमुख डॉ. मधुसूदन घाणेकर, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर डॉ. सुधीर कुलाल, विजय दामले आदी उपस्थित होते.डॉ. चाफेकर म्हणाले, ‘ग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी पुण्याच्या विविध भागात फिरून अवयवदानाचे महत्त्व सांगण्यात आले. यातून हजारो लोकांपर्यंत त्यांनी अवयवदानाचा संदेश पोहोचवला आहे. प्रत्येकाने अवयदानाचा गांभीर्याने विचार केल्यास अनेकांना नव्याने आयुष्य जगात येईल. आपले अस्तित्व इतरांच्या रूपाने कायम राहील.’डॉ. घाणेकर म्हणाले, ‘अवयवदानाबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी प्रसार होणे गरजेचे आहे. या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी अवयवदानात योगदान दिले आहे, अशा व्यक्तींच्या वारसांचा सन्मान केला पाहिजे. येत्या काळात याबाबत परिषद भरवून त्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न आहे.’मीना कुर्लेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर कुलाल यांनी आभार मानले. 

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणे